Yogi Adityanat उत्तर प्रदेशातील अमेठी येथे एका शिक्षकांच्या कुटुंबीयांच्या हत्येनंतर योगी सरकारने भरपाई म्हणून ३७ लाख रूपयांची भरपाई दिली. त्यापैकी ५ लाख रूपये रोख स्वरूपात देण्यात आले आहेत. त्याबरोबर ३३ लाख रूपयांचा धनादेश देण्यात आला. शिवाय मुख्यमंत्री आवास योजनेंतर्गत राहण्यासाठी एक घर आणि जमीन देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली असून सरकारने मदतीचे पाऊल उचलले आहे.
Read More
काँग्रेसने शुक्रवार, दि. ३ मे २०२४ राहुल गांधी अमेठीतून नव्हे तर रायबरेलीमधून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. याचा अर्थ ते भाजप नेत्या स्मृती इराणी यांच्याशी निवडणूक लढवणार नाहीत. आता सोशल मीडिया त्याच्या या निर्णयाची खिल्ली उडवली जात आहे. राहुल गांधींनी मैदान सोडल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. त्यांचे एक जुने विधान 'डरो मत' देखील पुन्हा शेअर केले जात आहे आणि 'फट्टूपप्पू' नावाने एक ट्रेंड चालविला जात आहे.
रायबरेलीत राहुल गांधी यांचा पराभव अटळ आहे. कदाचित वायनाडमध्येही ते पराभूत होतील. उद्या चुकून रायबरेली व वायनाडमध्ये राहुल गांधी विजयी झालेच, तर ते कोणत्या मतदारसंघाची निवड करतील? अर्थातच वायनाडची! एकवेळ राहुल गांधी यांनी फक्त वायनाडमधून निवडणूक लढविली असती आणि जरी ते त्यात पराभूत झाले असते, तरी मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल काही प्रमाणात विश्वास निर्माण झाला असता. पण, आता अखेरच्या क्षणी रायबरेलीतील उमेदवारी जाहीर केल्याने राहुल गांधी यांच्या हातून तेलही गेले, तूपही गेले आणि हाती फक्त धुपाटणे आले आहे!
गांधी कुटुंबाचा पारंपारिक मतदारसंघ मानल्या जाणाऱ्या अमेठीमध्ये काँग्रेसला उमेदवार मिळत नाहीये. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची घोषणा बराच काळ लोटला असला तरी अद्याप अमेठीत काँग्रेला उमेदवार निश्चित करण्यात अद्याप अपयश आले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत येथून राहुल गांधींच्या पराभवानंतर काँग्रेस चांगलीच हादरली आहे.
सोनिया गांधी २००४ पासून रायबरेलीच्या खासदार आहेत. सोनिया गांधी यांनी २००४ मध्ये राहुल गांधींसाठी अमेठीची जागा सोडली होती. आतादेखील सोनिया यांनी प्रियांका गांधी-वाड्रा यांच्यासाठी रायबरेली मतदारसंघ सोडला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, ज्या मतदारसंघामध्ये सोनिया गांधी यांच्यासारख्या भक्कम नेत्यास निवडणूक लढवून, ती जिंकणे अवघड झाले आहे, तेथे प्रियांका गांधींसारख्या राजकारणात अतिशय नवख्या नेत्यास जिंकणे कितपत शक्य होईल, हादेखील अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे.
अयोध्येचा प्रश्न सुटल्यानंतर आता काशी आणि मथुरा येथील हिंदूंच्या तीर्थस्थळांना मुक्त करण्यासाठी, जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. राम मंदिराच्या निर्माणाने उसळलेल्या ‘रामलहरी’त काँग्रेसची नाव बुडून जाईल, याचा अंदाज आल्यामुळेच, सोनिया गांधी यांनी कदाचित राज्यसभेचा पर्याय निवडला असावा.
लोकसभा समितीने राहुल गांधींना लोकसभेचे सदस्यत्व वापस मिळाल्यानंतर 12 तुघलक लेनवरील बंगला सरकारी निवास म्हणून दिला होता. पण राहुल गांधींना आता या घरात राहयचं नाही. राहुल गांधींना सरकारी बंगल्याचा ताबा आपल्याकडे १५ दिवसांच्या आत घ्यायचा होता. ज्यांची अंतिम मुदत २३ ऑगस्ट होती. पण राहुल गांधींनी बंगल्याचा ताबा घेतला नाही.
उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यात एका तरुणीचा मृत्यू हा पोलीस -प्रशासनासाठी कोड बनलयं. तरुणीचा मृत्यू हा खून आहे की आजारपणामुळे मृत्यू हे कळत नाही आहे. दोन दिवसांपुर्वी तरुणीचा संशयास्पद रित्या मृत्यू झाला. त्यानंतर नातेवाईकांनी आजारपणाचे कारण सांगून मृतदेह गावातच पुरला, त्यानंतर नातेवाइकांनी तरुणीला केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडिओ व्हायरल होताच हे प्रकरण प्रेमप्रकरणातून पुढे मारहाणीतून हत्या झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. त्या तरुणीचे नाव आफरीन होते.
गांधी घराण्याच्या पारंपरिक मतदारसंघामध्ये कॉंग्रेस पिछाडीवर
अमेठी येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राच्या नावे २ सुवर्ण, २ रौप्य व ५ कांस्य पदके
२०१९च्या लोकसभा निवडणुकांच्या निकालांनंतर अजूनही पराभूत मानसिकतेत बुडालेले विरोधक सावरलेले नाहीत. एकीकडे राहुल गांधींना काँग्रेसचे अध्यक्षपद नकोसे झाले, तर दुसरीकडे उत्तर प्रदेशात सपा-बसपाने वेगळी चूल मांडली.
घटनेनंतर स्मृती इराणी यांनी ताबोडतोब सिंह यांच्या कुटुंबीयांची भेट घेत हल्लेखोरांना पकडण्याचे आदेश दिले असल्याचे सांगितले. यावेळी भावुक झालेल्या स्मृती इराणींनी सिंह यांच्या पार्थिवाला खांदा दिला.
अमेठीवासीयांच्या रोषाचा फटका राहुलला बसला तर, त्याच अमेठीवासीयांच्या प्रेम-आपुलकीमुळे २०१४ साली अमेठीतूनच पराभव पत्कराव्या लागलेल्या स्मृती इराणी यंदा ‘जायंट किलर’ ठरल्या.
उत्तर प्रदेश मध्ये सगळेच दिग्गज राजकारणी आखाड्यात उतरले असताना लोकसभेत कोणाची बाजी लागणार याची उत्सुकता सर्वांनाच होती. अखेर आज निकालाचा दिवस असल्यामुळे मतमोजणीवरून हळूहळू कोणाचे पारडे जड याचा अंदाज लागण्यास सुरुवात झाली.
लोकसभेच्या पाचव्या टप्प्याचे मतदान सुरू असताना एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. उत्तर प्रदेशात राहुल गांधी निवडणूक लढवत असलेल्या मतदार संघात एका मतदान केंद्रावर बळजबरीने मतदान करायला लावल्याची तक्रार एका वृद्ध महिला मतदाराने केली आहे.
आता राहुल गांधींना की (राऊल विन्सी?) घुसखोरीचा निकष लागू होत नसला तरी दुहेरी नागरिकत्वाचा मुद्दा नक्कीच लागू होतो. म्हणूनच त्यांना खोटी माहिती सादर करण्यावरून निवडणूक लढविण्यापासून रोखण्याचा निर्णय अमेठीतील निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतल्यास आश्चर्य वाटणार नाही.
स्मृती इराणी यांच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाने महिला कामगारांसाठी मोठ्या प्रमाणावर योजना सुरू केल्या आहेत.
राहुल गांधींच्या चेहऱ्यावरील हिरव्या रंगाची लेझर लाईट ही स्नायपर हल्ल्याची असल्याचा दावा कॉंग्रेसने केला होता. मात्र, हा प्रकाश कॉंग्रेसच्या एका छायाचित्रकाराच्या मोबाईलचा प्रकाश असल्याचे गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे. राहुल गांधी यांच्या सुरक्षेत कोणतिही चुक झाली नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
रशियाच्या सहकार्याने या शस्त्रास्त्र निर्मितीच्या कारखान्यात आधुनिक एके-२०३ रायफलींची निर्मीती केली जाईल, अशी घोषणा केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी केली
राहुल गांधींनी २०१० साली केवळ कार्बाईन निर्मिती प्रकल्पाचा शिलान्यास केला होता, त्यात रायफलनिर्मितीचा कोणताही मुद्दा नव्हता, तर रविवारी नरेंद्र मोदींनी ‘एके-२०३’ रायफलनिर्मिती विभागाचे उद्घाटन केले. असे असतानाही असामान्य बुद्धिमत्ता लाभलेल्या राहुल गांधींना कार्बाईन, छोटी हत्यारे व एके-२०३ रायफल, तसेच शिलान्यास व उद्घाटनातील फरक कळत नाही.
लोकसभा निवडणूकीत मोदी सरकारला आव्हान देण्यासाठी राहुल गांधींनी चांगलीच कंबर कसली आहे. निवडणूकीच्या पाश्वभूमीवर त्यांच्या अमेठी मतदार संघात मॅरेथॉन बैठका दौरे सुरू केले आहेत. मात्र, त्यांच्याच मतदार संघाने त्यांना नाकारल्याचे चित्र गुरुवारी पाहायला मिळाले.
राहुल गांधींनी आता खरे तर अशी आश्वासने देण्यापेक्षा आत्मपरीक्षण करावे. आपल्याला मते का मिळत नाहीत, याचा विचार करावा. शिवाय एखाद्या शहराचा कॅलिफोर्निया करण्याची गोष्ट राहुल गांधी करतात, तर मग त्यांना संपूर्ण देशाच्या विकासाची भूमिका का मांडावीशी वाटत नाही? राहुल गांधी फक्त स्वतःच्या शहरापुरताच का विचार करतात?