पाण्यात पडले की पोहता येतेच मात्र, उत्तम मार्गदर्शन लाभल्यास मोठी प्रगती करता येते. सगळ्याच क्षेत्राचे तसेच आहे. बालरंगभूमीवरही बालनाट्यातून पुढे आलेले कलाकार आज संहिता लेखन ते चित्रपट, मालिका यांमध्ये काम करत आहेत. अशा काही कलाकारांच्या आयुष्यातील यशाचा घेतलेला आढावा...
Read More
आजकालची नवीन पिढी ही कित्येक पटीने अधिक प्रगल्भ आहे. त्यांना पडणारे प्रश्नही जुन्या पिढीच्या बालपणापेक्षा अधिक प्रगल्भ असतात. त्यांच्यातील ही प्रगल्भता कळत नकळत त्यांच्या विचार आणि आचारातून जाणवते. मुलांच्या याच विचारांचा नाटकाच्या पार्श्वभूमीवर घेतलेला आढावा...
'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेतील अनेक पात्रं प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली, पण सर्वाधिक लोकप्रियता मिळवणारी आणि आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी भूमिका म्हणजे जेठालाल गडा. ही भूमिका इतकी लोकप्रिय झाली की आज तिचं नाव घेतलं की लगेच डोळ्यासमोर फक्त दिलीप जोशीच येतात.
साऊथच्या प्रसिद्ध अभिनेत्यांना बेकायदेशीर बेटिंग अॅप्सना प्रोत्साहन देणे चांगलेच महाग पडले आहे. या बाबत ईडीने विजय देवरकोंडा, राणा दग्गुबती, प्रकाश राज यांच्यासह २९ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. सार्वजनिक जुगार कायदा, १८६७ चे उल्लंघन करून बेकायदेशीर बेटिंग अॅप्सना प्रोत्साहन दिल्याच्या आरोपाखाली हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अलिकडेच स्टार प्रवाहवरील 'ठरलं तर मग' या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता अमित भानुशाली याने नुकताच पंढरपूरच्या आषाढी वारीचा अनुभव घेतला. मात्र त्याच्यासाठी ही फक्त एक धार्मिक परंपरा नव्हती, तर अंतर्मनाला स्पर्श करणारा एक आत्मिक प्रवास ठरला असा अनुभव अमितने आपल्या शब्दांत उलगडला.
बालगंधर्व हे मराठी रंगभूमीवरील एक अजरामर नाव आहे. ते उत्कृष्ट गायक, नट, आणि नाटककार म्हणून प्रसिद्ध होते. बालवयातच त्यांच्या सुरेल आवाजामुळे त्यांना "बालगंधर्व" ही पदवी लोकमान्य टिळकांनी दिली. "गंधर्व" म्हणजे दैवी गायक, आणि ते गात असताना रसिक मंत्रमुग्ध होत असे. बालगंधर्व यांचे पूर्ण नाव ' नारायण श्रीपाद राजहंस' होते, त्यांचा जन्म २६ जून १८८८ महाराष्ट्रात सांगली येथे झाला.
मराठी चित्रपटसृष्टीत थ्रिलर, रहस्य आणि विनोदी यांचा मिलाफ असणाऱ्या काही निवडक चित्रपटांमध्ये लवकरच आणखी एका दमदार चित्रपटाची भर पडणार आहे, ती म्हणजे ‘गाडी नंबर १७६०’ची. तन्वी फिल्म्स प्रस्तुत आणि योगीराज संजय गायकवाड दिग्दर्शित या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, रहस्य आणि विनोदाने भरलेला हा ट्रेलर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या अकस्मात निधनाला आज पाच वर्षे पूर्ण झाली. १४ जून २०२० रोजी मुंबईतील आपल्या घरात सुशांत मृत अवस्थेत आढळला होता. या प्रकरणावरून संपूर्ण देश हादरला होता. आज त्याच्या पाचव्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्याची बहिण श्वेता सिंह कीर्ती हिने एक भावुक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत त्याच्या आठवणी जागविल्या.
माध्यमांच्या आजच्या जडणघडणीचा अविभाज्य घटक असलेल्या आणि या वर्षी विशेष प्रभावशाली ठरलेल्या कला, सामाजिक, राजकारण अशा विविध विभागांमध्ये आपला जोरदार ठसा उमटवणाऱ्या मान्यवर दिग्गज व्यक्तींच्या कार्याचा गौरव 'मीडिया एक्सलन्स अवॉर्ड्स २०२५' देऊन करण्यात आला. 'माई मीडिया २४' प्रस्तुत मीडिया असोशिएशन ऑफ इंडियाच्या वतीने व प्लँनेट मराठी अक्षय बर्दापूरकर यांच्या सहकार्याने पुरस्कार सोहळा संपन्न झाला.
तामिळ अभिनेते आणि राजकीय पक्ष मक्कल निधी मय्यम (MNM) चे प्रमुख कमल हसन यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून कर्नाटक उच्च न्यायालयाने त्यांना फटकारले आहे. त्यांनी नुकतेच ''कन्नड ही तामिळ भाषेपासून जन्मलेली आहे'' असे वक्तव्य चेन्नईत त्यांच्या आगामी थग लाइफ या चित्रपटाच्या संगीत प्रकाशन सोहळ्यात केले होते, ज्यामुळे कर्नाटकमध्ये मोठा वाद निर्माण झाला.
चौकट मोडून वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करून पाहायला कलाकार कायमच उत्सुक असतात. आपल्या विनोदी शैलीने मालिका आणि चित्रपटात मजेशीर रंग भरणारे अभिनेते अभिजीत चव्हाण आता प्रथमच वेगळ्या सशक्त भूमिकेत दिसणार आहेत. ‘सुंदर मी होणार’ या नाटकातल्या महाराज (संस्थानिक) या महत्त्वपूर्ण भूमिकेतून अभिजीत चव्हाण अनेक वर्षानंतर मराठी रंगभूमीवर काम करणार आहेत. स्वतःची विनोदी इमेज ब्रेक करत एक अत्यंत गंभीर आणि भावनिक पात्र साकारण्याचे शिवधनुष्य पेलणाऱ्या अभिजीत यांना साथ करत अभिनेते अमोल बावडेकर यांचा ही अनोखा अंदाज या नाटकात
बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान यांनी आपल्या करिअरमधील कदाचित शेवटच्या चित्रपटाचा संकेत दिला आहे. 'महाभारत' हे भव्य दिव्य सिनेमा त्यांचं अंतिम आणि सर्वात महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट असू शकतं, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. “माझं स्वप्न आहे की मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत काम करत राहावं…,” असं ते म्हणाले.
तीन अतरंगी मित्रांची भन्नाट कहाणी सांगणाऱ्या 'आंबट शौकीन'चा धमाल ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरमध्ये ललित, वरूण आणि रेड्डी हे तीन खट्याळ मित्र दिसत असून ते हसवण्यासोबत विचार करायलाही भाग पाडत आहेत. प्रेम, मैत्री, सोशल मीडियाच्या आभासी दुनियेत हरवलेली ओळख व मानसिक गुंतागुंत हे सगळे या चित्रपटात मांडण्यात आले आहे. सा तिघांच्या आंबटपणामुळे त्यांच्या आयुष्यात काय वादळ येणार, हे पाहाणे रंजक ठरणार आहे.
मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सोमवार, दि. २६ मे रोजी अभिनेता डिनो मोरिया याची चौकशी केली. सकाळी ११ वाजता तो आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर झाला. या प्रकरणात याआधी त्याचा भाऊ सँटिनो मोरिया याचीही चौकशी करण्यात आली आहे.
प्रसिद्ध अभिनेते मुकुल देव यांचे वयाच्या ५४ व्या वर्षी निधन झाले आहे. शुक्रवार, दि. २३ मे रोजी दिल्लीतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते काही दिवसांपासून आजारी होते आणि आयसीयूमध्ये उपचार घेत होते.
मराठी चित्रपट सृष्टीतील असंख्य कलाकारांच्या योगदानाचा गौरव करणारा "मातृभाषा सन्मान पुरस्कार" सोहळा यंदा १४ मे २०२४ रोजी मुंबईच्या रविंद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे अत्यंत भव्यदिव्य आणि सन्मानपूर्वक वातावरणात पार पडला. नारायण देसाई फाउंडेशनतर्फे आयोजित या सोहळ्याचे उद्दिष्ट होते राष्ट्रीय पातळीवर मराठी सिनेमा संस्कृतीचे जतन, संवर्धन आणि विकास घडवणे, तसेच सिनेसृष्टीतील गुणवंत कलाकारांना सन्मानित करून त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देणे.
सध्या सोशल मीडियावर एक गाणं जोरदार ट्रेंडमध्ये आहे ते म्हणजे ‘धतड तटड धिंगाणा’! ‘पी.एस. आय. अर्जुन’ चित्रपटातील हे प्रमोशनल साँग प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस उतरत असून विशेषतः तरुण वर्ग यावर मोठ्या प्रमाणावर रील्स आणि व्हिडीओ तयार करत आहे. नुकताच या गाण्याचा व्हिडीओ प्रेक्षकांच्या भेटीला आला असून यातील हूक स्टेप सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. तरूणाईचा ‘स्टाईल आयकॅान’ असलेल्या अभिनेता अंकुश चौधरीचा या गाण्यातील रूबाबदार लूकही सध्या अनेकांना भावतोय.
बॉलीवूडचा किंग खान – शाहरुख खान – यंदाच्या मेट गाला 2025 मध्ये आपल्या खास अंदाजात पदार्पण करताना दिसला. जगभरातील चाहते जिथं त्यांच्या एका झलकसाठी आतुर असतात, तिथं अमेरिकेतील परदेशी माध्यमांपुढे शाहरुखला स्वत:चं नाव सांगावं लागलं. “I am Shah Rukh,” असं स्वतःचं ओळख करून देताना शाहरुखचा साधेपणा आणि आत्मविश्वास दोन्ही झळकले.
Bollywood actorts at Waves Summit 2025
( actor akshay kumar WAVES Summit 2025 ) वेव्स समिट २०२५ च्या पहिल्या दिवशी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये सुरु असलेल्या चर्चासत्रांमध्ये अभिनेता अक्षय कुमार आणि मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांच्यातील संवादाने विशेष लक्ष वेधून घेतलं. भारतीय सिनेसृष्टीतील बौद्धिकतेबद्दल बोलताना अक्षय कुमारने मल्याळम चित्रपटसृष्टीचा गौरव करत तिला “भारतीय सिनेमाचा बौद्धिक आत्मा” असं संबोधलं.
बॉलिवूडचा अॅक्शन हिरो टायगर श्रॉफला ठार मारण्याचा बनावट कट उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. मंगळवारी मुंबई पोलिसांना एका व्यक्तीकडून फोन आला, ज्यामध्ये त्याने असा दावा केला की, एका सिक्युरिटी एजन्सीच्या मालकाने त्याला टायगर श्रॉफचा खून करण्यासाठी सुपारी दिली आहे. त्यासाठी त्याला दोन लाख रुपये आणि रिव्हॉल्वर दिल्याचे त्याचे म्हणणे होते.
चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या 'राजा हरिश्चंद्र' या चित्रपटाचे पहिले प्रदर्शन २१ एप्रिल १९१३ रोजी गिरगाव येथील ऑलिम्पिया थिएटर येथे झाले होते. त्या घटनेला ११२ वर्ष पूर्ण झाली आहेत. या दिवसाचे महत्त्व लक्षात घेत दरवर्षी याच काळात आंतरराष्ट्रीय दर्जाचा 'चित्रपताका' या मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली. तसेच, तंत्रज्ञानावरील आव्हानांवर मात करण्यासाठी मराठी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक यांना राज्य सरकारकडून आर्थिक पाठबळ देण्यात येणार असल्
झी स्टुडिओज् नेहमीच प्रेक्षकांना, मनोरंजक, दर्जेदार आशय असलेले चित्रपट देत आले आहेत. झी स्टुडिओज्, चॉक अँड चीज फिल्म्स आणि फिल्म जॅझ मिळून आपल्यासाठी असाच एक सकारात्मक दृष्टिकोन देणारा चित्रपट आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत . सहकुटुंब हसत खेळत प्रत्येकाला अंतर्मुख करायला लावणारा 'आता थांबायचं नाय' हा चित्रपट येत्या महाराष्ट्र दिना दिवशी म्हणजेच १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सत्य घटनेवर आधारित या प्रेरणादायी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. संधी ही कशी आणि केव्हा चालून येईल हे स
बंगळुर : कन्नड चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते बँक जनार्दन यांचे रविवारी रात्री, १३ एप्रिलला निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते. बंगळुरूमधील एका खासगी रुग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. जनार्दन गेल्या काही काळापासून आजारी होते आणि त्यांना नुकतेच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मुंबई : 'तुझ्यात जीव रंगला', 'देवमाणूस', 'रानबाजार', 'अल्याड पल्याड, लंडन मिसळ या कलाकृतींमुळे अभिनेत्री माधुरी पवार घराघरांत लोकप्रिय झाली. ती उत्तम नृत्यांगणा देखील आहे. नुकतेच तिला दोन मोठे प्रोजेक्ट्स मिळाले आहेत तिने येड लागल प्रेमाच आणि शिट्टी वाजली रे या दोन शोचे प्रोमो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
यंदाच्या कडाक्याच्या उष्णतेचा प्रभाव कमी करता यावा, यासाठी मे महिन्यात सगळ्यांच्या मनाला थंडावा देणारा ‘गुलकंद’ हा चित्रपट दि. १ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. यानिमित्ताने अभिनेते आणि विनोदवीर समीर चौघुले यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने केलेली ही दिलखुलास बातचीत...
हिंदी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे दीर्घ आजाराने मुंबईत निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते, तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
(CM Devendra Fadnavis pays tribute to Veteran Actor Manoj Kumar) देशभक्तीपर चित्रपटांच्या मालिकेमुळे भारतकुमार म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक मनोजकुमार शुक्रवार, दि. ४ एप्रिल रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ अभिनेते - चित्रपट निर्माते मनोजकुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विडंबनात्मक गाणं सादर केलं, त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी कुणाल कामराविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, त्याला चौकशीसाठी समन्सही बजावण्यात आलं आहे. मात्र, अद्याप त्याने हजेरी लावलेली नाही. या पार्श्वभूमीवर, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी स्टँडअप कॉमेडी आणि या वादावर प्रतिक्रिया दिली आहे.
वास्तविक जीवनावर आधारित झी स्टुडिओज्, चॉक अँड चीज फिल्म्स आणि फिल्म जॅझ निर्मित मल्टीस्टारर मराठी चित्रपट 'आता थांबायचं नाय!' च दमदार पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला !
ब्लॉकबस्टर चित्रपटांनंतर, हिट मराठी कॉमेडी फ्रँचायझी तिसऱ्या भागासह परतली आहे.ये रे ये रे पैसा ३ अखेर येत आहे. यावेळी, निर्माते आणखी गोंधळ आणि मनोरंजनाचे आश्वासन देत आहेत. संजय जाधव हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत, तर त्यांनी आणि अरविंद जगताप यांनी एकत्रितपणे पटकथा लिहिली आहे. तेजस्विनी पंडित, संजय नार्वेकर, आनंद इंगळे, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, वनिता खरात, नागेश भोंसले आणि विशाखा सुभेदार या कलाकारांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट १८ जुलै २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. धर्मा प्रॉडक्शन्स या चि
अभिनेता ते राजकारणी असा प्रवास केलेल्या पवन कल्याण यांनी तमिळनाडूतील हिंदी विरोधावर टीका करताना, तमिळ राजकीय नेते ढोंगी असल्याचा आरोप केला. त्यांनी विचारले की, "तमिळनाडूतील नेते हिंदीच्या सक्तीला विरोध करतात, पण त्याचवेळी त्यांच्या चित्रपटांचे हिंदीत डबिंग करून व्यावसायिक लाभ घेतात. यामध्ये नेमका कोणता न्याय आहे?"
तामिळनाडू सुन्नत जमातने अभिनेता थलपती विजयच्या विरोधात चेन्नई पोलीस आयुक्त कार्यालयात तक्रार दाखल केली आहे. इफ्तार कार्यक्रमात ‘मुस्लिमांचा अपमान’ झाल्याचा त्यांचा आरोप आहे. तक्रारीबाबत बोलताना तामिळनाडू सुन्नत जमातचे खजिनदार सय्यद कौस यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले, "विजय ने आयोजित केलेल्या इफ्तार कार्यक्रमात मुस्लिमांचा अपमान करण्यात आला. या कार्यक्रमात काही मद्यपी आणि गुंड सामील झाले होते, ज्यांचा उपवास किंवा इफ्तारशी काहीही संबंध नव्हता. त्यामुळे हा कार्यक्रम मुस्लिमांसाठी अपमानास्पद ठरल
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता शशांक केतकर लवकरच रंगभूमीवर पुनरागमन करत आहे. नाटक, मालिका, चित्रपट, वेब सिरीज अशा विविध माध्यमांमध्ये आपली छाप उमटवल्यानंतर आता तो पुन्हा एकदा नाटकासाठी सज्ज झाला आहे. शशांक शेवटचा गोष्ट तशी गमतीची या नाटकात दिसला होता. अद्वैत दादरकर दिग्दर्शित या नाटकात त्याने लीना भागवत आणि मंगेश कदम यांच्यासोबत काम केलं होतं. मात्र, या नाटकानंतर तो फारसा रंगभूमीवर दिसला नव्हता. आता तो ‘११ वपुर्झा’ या विशेष नाट्यप्रयोगात झळकणार आहे.
कॉफीची नजाकत काही वेगळीच! मग ती कोल्ड असो वा हॉट! कॉफीच्या शौकिनांची संख्या कमी नाही. कॉफीचा खरपूस दरवळ जसा घरभर पसरतो, तसाच आता रंगभूमीवर कॉफीचा दरवळ पसरणार आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर यांनी ही 'फिल्टर कॉफी’ नाट्यरसिकांसाठी आणली आहे. अद्वैत आणि अश्वमी थिएटर्स प्रकाशित महेश वामन मांजरेकर सादर करीत असलेली ही तजेलदार कॉफी ६ एप्रिलला रंगभूमीवर येणार आहे. रितीशा प्रोडक्शन्स निर्मित महेश मांजरेकर लिखित दिग्दर्शित ‘फिल्टर कॉफी’ या नाटकांचे निर्माते दिलीप माधव जगताप असून सहनिर्माते राहुल भंडारे आहेत.
'झी चित्र गौरव पुरस्कार २०२५’ सोहळ्याची जोरदार चर्चा सुरू असून, प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. या सोहळ्याचे सूत्रसंचालन रितेश देशमुख आणि अमेय वाघ करत आहेत. कार्यक्रमातील एका खास क्षणी संपूर्ण वातावरण भावनिक झालं, जेव्हा अभिनेता जितेंद्र जोशीने दिवंगत नेते विलासराव देशमुख यांनी लिहिलेलं एक पत्र रितेशसमोर वाचून दाखवलं.
गेल्या काही आठवड्यांपासून देशभरात विविध ठिकाणी आगीच्या घटना समोर येत आहेत. अशातच मुंबईतील फिल्मसिटीमध्ये एका टीव्ही शोच्या सेटला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत, सोनी सब वाहिनीवरील ‘तेनाली रामा’ या मालिकेच्या सेटवर २ मार्च रोजी, रविवारी सकाळी आग लागली.
गेल्या काही दिवसांपासून अभिनेता पुष्कर जोगच्या ‘हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय?’ या आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. लैंगिक सुसंगतेवर भाष्य करणारा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकताच या चित्रपटाचा उत्सुकता वाढवणारा ट्रेलर रसिकांच्या भेटीला आला आहे.
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत चर्चांना उधाण आले आहे. ३७ वर्षांच्या संसारानंतर दोघंही विभक्त होणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. वारंवार होणाऱ्या मतभेदांमुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
“मी जेव्हा घरी असतो, तेव्हा मला नेहमी वाटतं की, मी माझ्या नातवंडांमध्ये नसून, कोणत्या तरी महिलांच्या वसतिगृहात आहे. कधी कधी तर मी त्या महिला वसतिगृहाचा वॉर्डन असल्याची भावना निर्माण होते. कारण, आमचं संपूर्ण घरचं महिलांनी भरलेलं असतं. म्हणूनच किमान यावेळी तरी रामचरणला मुलगा व्हावा, अशी माझी इच्छा आहे. जेणेकरून आमचा वारसा पुढे चालू राहील. त्याला सुंदर मुली आहेत, पण मला भीती वाटते की, त्याला पुन्हा मुलगी होईल,” असे म्हणणारा दुसरा-तिसरा कुणी नाही, तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेता चिरंजीवी! ‘ब्रह्म
नाट्यपरिषद ही आपल्या मराठी नाट्य सृष्टीची शिखर संस्था. नाटक, रंगकर्मी आणि प्रेक्षक यांच्यातील सेतू म्हणून काम करत असताना अनेक अभिनव उपक्रम, संकल्पना नाट्यपरिषद सातत्याने राबवत असते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या १०० व्या नाट्य संमेलनानिमित्त नाट्य परिषदेतर्फे प्रथमच विशेष नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नुकत्याच आयोजित पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती देण्यात आली. या पत्रकार परिषदेला नाट्यपरिषदेचे अध्यक्ष श्री. प्रशांत दामले, उपाध्यक्ष (उपक्रम) श्री. भाऊसाहेब भोईर, प्रमुख कार्यवाह श्री. अजित भुर
लहान मुलांच्या भावविश्वात खूप काही सुरू असतं. मुलांना अनेक प्रश्न पडत असतात. त्या प्रश्नांची उत्तरं मुलं आपल्या पद्धतीनं शोधण्याचा प्रयत्न करतात. “मुक्काम पोस्ट देवाचं घर” या चित्रपटात ग्रामीण भागातली गोष्ट मांडण्यात आली आहे. सैन्यात असलेले वडील देवाघरी गेले असं आईनं मुलीला सांगितल्यावर देवाचं म्हणजे काय ? आणि ते कुठे असतं? याचा शोध सुरू होतो.
अभिनेता सिद्धार्थ खिरीड याने आजवर मालिकांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या. सिद्धार्थची 'फ्रेशर्स' ही मालिका प्रचंड गाजली होती. दरम्यान, सिद्धार्थ एक चांगला अभिनेता तर आहेच पण तो उत्कृष्ट डान्सर आहे हे देखील आपल्या सर्वांना माहितच आहे. सिद्धार्थने काहीच दिवसांपूर्वी सोशल मीडियावर त्याच्या होणाऱ्या बायकोची झलक सोशल मीडियावर शेअर केली. त्यावेळी सिद्धार्थने तिचा चेहरा दाखवला नव्हता. मात्र, आता त्याने तिचे नाव आणि चेहरा हे दोन्ही जाहिर केले आहे.
पंजाबी गायक दिलजीत दोसांझ याने नववर्षाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत सदिच्छा भेट घेतली. पंतप्रधानांनी देश आणि संगीत क्षेत्राबद्दल दिलजीतसोबत गप्पा मारल्या. दरम्यान, दिलजीतने पंतप्रधानांच्या या भेटीचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. तसेच, या भेटीत त्याने त्याचा अनुभव आणि पंतप्रधानांशी झालेल्या चर्चेबद्दलही लोकांना माहिती दिली आहे.
सुभेदार, फत्तेशिकस्त, शिवरायांचा छावा, पावनखिंड, मुंज्या अशा अनेक चित्रपटांमध्ये आणि असंभव, शुभं करोति, तु तिथे मी अशा अनेक मालिकांमध्ये विविधांगी भूमिका गाजवणारे अभिनेते अजय पुरकर ( Ajay Purkar ) यांच्याशी Unfiltered गप्पा With कलाकारचा भाग छान रंगला... नक्की पाहा
'अॅनिमल' चित्रपटामुळे हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची कायमस्वरुपी छाप उमटवणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते उपेंद्र लिमये यांनी आता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीकडे वाटचाल सुरु केली आहे. त्यांच्या बहुरंगी अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मराठी, हिंदीतील अनेक भूमिकांचे आजवर कौतक झाले. आणि आता थेट दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शकांनी मराठमोळ्या उपेंद्र लिमये यांचं कौतुक केलं आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय अशी ओळख असणारा अभिनेता स्वप्नील जोशी याने त्याच्या चाहत्यांना नुकतीच एक आनंदाची बातमी दिली आहे. २०२४ हे वर्ष संपण्यापुर्वी त्याच्या घरी नव्या पाहूणीचं आगमन झालं आहे. आणि ती पाहूणी म्हणजे नवी कोरी आलिशान डिफेंडर गाडी. इतकी महागडी गाडी घेतल्यानंतर अखेर माझी स्वप्नपुर्ती झाल्याची प्रतिक्रिया स्वप्नील जोशीने दिली आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीतील शांत आणि गुणी अभिनेता अशी ओळख मिळवणाऱ्या सुशांत सिंह राजपूतने फार लवकरच या जगाचजा निरोप घेतला. त्याच्या मृत्यूला चाडेचार वर्ष उलटून गेली असली तरी अजूनही त्याच्या आठवणींमध्ये हरवले आहेत. एकीकडे त्याचे चाहते त्याच्या आठवणीनं व्याकूळ होत आहेत, तर दुसरीकडे अनेक चाहते त्याला न्याय मिळावा देण्याची मागणीही करत आहेत. या दरम्यान, आता अभिनेता प्रतिक बब्बर याने सुशांत सिंगबाबत खुलासा केला आहे. प्रतिकने सुशांतसोबत २०१९ मध्ये 'छिछोरे' या चित्रपटात काम केलं होतं.
आपल्या मृत्यूनंतर जवळच्या व्यक्तीच्या बोलण्यात आपण हयात असताना कोणकोणत्या क्षेत्रात पारितोषिके कमावली किंवा करिअरमध्ये किती यशोशिखरे गाठली, याचा उल्लेखच नसेल, तर आपण काय जीवन जगलो? असा प्रश्न स्वतःला वयाच्या ६९व्या वर्षी विचारत, जीवनाचा एक नवा अध्याय सुरु करणार्या विजय मॅथ्यू यांची कथा ‘विजय ६९’ या चित्रपटात मांडली आहे. ‘नेटफ्लिक्स’वर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी वयाची नवी ‘इनिंग’ सुरू करणार्या लोकांचे उत्तम प्रतिनिधित्व करत आपल्या वयोवृद्ध पालकांचेही मन समजून क
’झी नाट्यगौरव २०२४’मध्ये प्रायोगिक विभागातून साहाय्यक अभिनेता होण्याचा मान मिळवणार्या, बारामतीच्या सोमनाथ लिंबारकर यांच्या नाट्यप्रवासाविषयी...