रामदासांनी स्त्रियांविषयी आदर दाखवून स्त्रीत्वाचा सन्मान केलेला आहे. असेच त्यांच्या चरित्रावरून व दासबोधातील वेच्यांवरून दिसून येते. दासबोधातील स्त्री-पुरुष भेदासंबंधी विवरण महत्त्वपूर्ण आहे.
Read More
या मानवी समाजव्यवस्थेत म्हणजेच संपूर्ण जगात (ये) जे लोक (भक्षयन्त:) विविध पदार्थांचा उपभोग घेत-घेत (वसूनि) त्या भोग्य वस्तूंना, ऐश्वर्यांना (न आनृधु:) वाढवित नाहीत किंवा त्यात वृद्धी करीत नाहीत. अशा प्रकारे (यान्) ज्या लोकांना (धिष्ण्या: अग्नय:) परमेश्वराद्वारे जगात स्थापन झालेल्या प्राण-अपान इ. अग्नी (अनु अतप्यन्त) भोगानंतर संतप्त करतात, जाळून टाकतात. (तेषाम्) अशा त्या लोकांच्या (या अवया) ज्या काही अधोगतीला नेणार्या, खाली खेचणार्या (दुरिष्टि:) वाईट यजन क्रिया, अनिष्ट वृत्ती आहेत. (तान्) त्या सर्वांना (वि
चैत्र पौर्णिमेच्या पावन पर्वावर हनुमान जयंती साजरी केली जाते. दरवर्षी हनुमान जयंती उत्साहात साजरी जरुर करावी. परंतु, अंत:करणात प्रभू रामचंद्रांना सदैव ठेवणार्या हनुमंताचा जोवर आपल्या अंत:करणात जन्म होत नाही, तोपर्यंत आपली उपासना अधुरी आहे. हनुमंताचे गुण आपल्यामध्ये वागवणं हीच खरी हनुमान जयंती होय.
आत्मज्ञान मिळवावे असे त्यांना वाटत नाही. त्यांच्या ठिकाणी स्वार्थबुद्धी असल्यामुळे दान, धर्म, सदाचरण, भक्ती, सद्गुण, परोपकार, नम्रता यांचे महत्त्व प्रापंचिकाला समजत नाही. त्यातील आनंद त्याला घेता येत नाही.
‘स्तवन’नाम दशक हे दासबोधातील पहिले दशक आहे. या दशकात दहा समास असून त्यापैकी पहिला समास हा प्रास्ताविक स्वरूपाचा आहे. त्यात समर्थांनी सांगितले आहे की, या ग्रंथाचे नाव ‘दासबोध.’