वर्षानुवर्षे अव्याहतपणे सुरू असलेल्या पंढरपूरच्या आषाढी वारीमध्ये मागील काही वर्षांपासून स्वच्छता, पर्यावरण, सेवा आणि समरसता याचे आयाम जोडले गेले आहेत. समविचारी संस्था यासंदर्भात काम करीत आहेत. हजारो हात सेवेच्या कामात गुंतलेले असतात. समाजातील अनिष्टावर मात करून सत्कार्य आणि सत्कर्माचा सिद्धांत रुजविणार्या वारकरी संप्रदायाच्या परंपरेचे हे स्वयंसेवक पाईक होत आहेत.
Read More