रा. स्व. संघाचे माजी सह सरकार्यवाह आणि अभाविपचे माजी संघटनमंत्री मदनदासजी देवी यांचे दि. २४ जुलै रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर मदनदासजींनी घडविलेले असंख्य कार्यकर्ते, स्वयंसेवक यांनी त्यांच्याप्रतीच्या भावना विविध माध्यमांतून व्यक्तही केल्या. देशाच्या कानाकोपर्यात श्रद्धांजली सभांमधून मदनदासजींना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. त्यानिमित्ताने मदनदासजींची लहान बहीण मंगल परीख यांनी त्यांच्या लाडक्या पिलाभईंच्या स्मृतींना दिलेला उजाळा...
Read More
"मदनदासजी जेवढ्या सहजतेने अभाविपमध्ये वावरायचे, तितक्याच सहजतेने ते रा.स्व.संघातही राहायचे. असा व्यापक स्वरुपात प्रवास करणारा कार्यकर्ता आज एकाएकी थांबला. त्यांनी ईथवर आणलेले हे कार्य त्यांच्याच विचारांनी पुढे घेऊन जाणं, हीच त्यांच्यासाठी खरी श्रद्धांजली ठरेल.", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (रा. स्व. संघ) ज्येष्ठ प्रचारक सुरेश सोनी यांनी केले. रा.स्व.संघाचे माजी सह सरकार्यवाह आणि अभाविपचे माजी राष्ट्रीय संघटनमंत्री मदनदासजी देवी यांना श्रद्धांजली म्हणून दि. ८ ऑगस्ट रोजी दादर पूर्व येथील राजा शिव
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कामाला सुरुवात केल्यानंतर काही वर्षांनी मदनदासजींची एका प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत भेट झाली. जुजबी ओळख झाली. पण, त्यावेळी पहिल्याच भेटीत मी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने भारावून गेलो. ‘कार्यकर्ता कसा असावा?’ या सत्रात अनेकदा एक सुभाषित सांगितले जात असे - ‘वज्रादपि कठोराणि मृदूणी कुसमादपि।’ म्हणजे कार्यकर्ता स्वतःच्या बाबतीत कठोर, तर दुसर्याच्या बाबतीत फुलाप्रमाणे मृदू असला पाहिजे. मदनदासजी या उक्तीचे तंतोतंत पालन कार्यकर्ता म्हणून आपल्या व्यवहारात ते करीत होते.
“आम्ही सर्व घडविणारे कार्यकर्ते आहोत. ‘ये हृदयीचे ते हृदयी’ यासाठी ‘आधी ये हृदयी....’ आवश्यक असते. यासाठी माझ्यात काय पाहिजे? काय आहे? काय नाही? याचा शोध आपण सतत घेतला पाहिजे,” असे उद्बोधक विचार मदनदासजींनी दि. २६ जुलै, २००८ रोजी रा. स्व. संघ पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या प्रांतिक बैठकीवेळी बौद्धिक वर्गात मांडले होते. सदरील बौद्धिक वर्गातील संदर्भ हे २००८ मधील असून त्याचे टिपण देत आहोत.
मदनदास देवी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अर्ध्वयू आणि समाजजीवनावर आपली अमीट छाप उमटवणारे समाजशिल्पी. समाजशिल्पी एवढ्यासाठी की, त्यांनी हजारो कार्यकर्त्यांमधील सामाजिक चेतना जागृत केली. केवळ जागृत केली नाही, तर प्रवाही केली. त्या प्रवाहाने हा देश नव्याने घडला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक आणि माजी सह सरकार्यवाह मदनदास देवी यांचे निधन माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांसाठी अत्यंत दुःखद आणि वेदनादायक आहे. माझ्या विद्यार्थीदशेत मदनदासजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे संघटनमंत्री होते. त्यामुळे तेव्हापासून अलीकडच्या काळापर्यंत त्यांच्या मार्गदर्शनाचे भाग्य मला लाभले. अभाविपची पाळेमुळे घट्ट करणे आणि त्या संघटनेचा विकास यात मदनदासजींचा सिंहाचा वाटा आहे. ते चार्टर्ड अकाऊंटन्सीमध्ये सुवर्ण पदक विजेते होते.
काही दिवसांपूर्वीच मदनदास देवीजी यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर, भारत देशाने मदनदास देवीजी यांच्यासारखे एक महान व्यक्तिमत्त्व गमावले आहे. त्यांच्या जाण्याने माझ्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लाखो स्वयंसेवकांना जे दु:ख झाले, ते या ठिकाणी शब्दात व्यक्त करणे कठीण आहे.
नाशिकमध्ये विद्यार्थ्यांना रातोरात मिळाली अडीचशे जातप्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र मिळत नसल्याने अभाविपतर्फे समाज कल्याण उपायुक्त, नाशिक यांच्या कार्यालयात बुधवारी रात्रभर ठिय्या मांडण्यात आला. अभाविपच्या दणक्यानंतर मध्यरात्री १ वाजता उपस्थित विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र वाटप सुरू होऊन सकाळपर्यंत २५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र देण्यात आले.
भारतीय जनता युवा मोर्चाकडून महाराष्ट्र भरात तीव्र आंदोलनाचा इशारा!
धुळे येथे अभाविपच्या कार्यकर्त्यांना झालेल्या अमानुष मारहाणीचा केला तीव्र शब्दांत निषेध!
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने शुक्रवाररोजी सायंकाळी ७ वाजेला सिनेट सदस्य आपल्या भेटीला या उपक्रमाचे आयोजन उमवि परिसरातील विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या वस्तीगृहावर करण्यात आले.