भारतात बेकायदेशिररित्या घुसखोरी करणाऱ्या २० बांगलादेशींना मुंबईतील न्यायालयाने आठ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्यांच्याकडून प्रत्येकी चार हजार रुपयांचा दंडही वसूल करण्याचा आदेश दिला आहे. दंड न भरल्यास त्यांना १६ महिन्यांची अतिरिक्त शिक्षा भोगावी लागणार आहे. बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करणे आणि बनावट ओळखपत्र आणि इतर कागदपत्रे बनवल्याबद्दल न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले. शुक्रवार, दि. २४ मे २०२४ शिक्षेची घोषणा करण्यात आली.
Read More