हिंदी चित्रपटसृष्टीचे सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी बुधवार दि. २ ऑगस्ट रोजी रायगड जिल्ह्यातील कर्जत-चौकफाटा येथे त्यांनीच उभारलेल्या एन.डी. स्टुडिओत गळफास घेत त्यांनी आत्महत्या केली. आहे. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टी हादरली आहे. दरम्यान, या एनडी स्टुडिओवर जप्तीची टांगती तलवार होती. दरम्यान देसाई यांनी आत्महत्या का केली? असा प्रश्न उपस्थित होत असताना देसाईंवर मोठे कर्ज होते असे वृत्त समोर येत आहे.
Read More
बालगंधर्व संगीत रसिक मंडळाच्यावतीने दिला जाणारा बालगंधर्व गुणगौरव पुरस्कार प्रसिद्ध गायक आणि गुरु पं. मुकुंद मराठे यांना जाहीर करण्यात आला आहे.
“ ‘आत्मनिर्भर भारत’ ज्यांच्या नेतृत्वाखाली घडवायचे आहे, त्या नेतृत्वाचा हा सत्कार आहे. पाच ट्रिलियनची अर्थव्यवस्था करण्याचे पंतप्रधानांचे लक्ष्य आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ करण्यासाठी औद्योगिक उत्पादन दुप्पट केले पाहिजे. निर्यात वाढवावी लागेल. उद्यमशील कर्तृत्वे सर्वांसमोर आली पाहिजे. उद्यमशीलता वाढली पाहिजे. औद्योगिक राष्ट्रवाद महत्त्वाचा असून बाबा कल्याणी त्याचे प्रतीक आहेत,” असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते व वाहतूक महामार्ग बांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी केले.
संगीत नाटकाला ध्यास व श्वास मानून आपल्या अलौकिक स्वरांच्या जादूने गेली ६० वर्षे अव्याहतपणे रंगभूमीची सेवा करणार्या ज्येष्ठ रंगकर्मी, गायिका कीर्ती शिलेदार यांचे शनिवार, दि. २२ जानेवारी रोजी पुणे येथे निधन झाले. वयाच्या दहाव्या वर्षी कीर्ती शिलेदार यांनी रंगभूमीवर पहिले पाऊल ठेवले, त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. अनेक नाटकांच्या माध्यमातून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार्या कीर्ती शिलेदार यांना श्रद्धांजली वाहणारा हा लेख...
ब्रिटिशांनी जसं प्रदर्शनरुपात आपल्या नाटक आणि संगीताच्या प्रेक्षक-श्रोत्यांचा इतिहासच लोकांसमोर मांडला, तसं आपल्याला करता येईल का? याचा विचार करताना असं आढळतं की, अशा प्रकारची संग्राहक वृत्ती आपल्याकडे अभावानेच आहे.
आधुनिक भारताच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या घटनेवर आधारित चित्रपट आहे. या महत्त्वपूर्ण घटनेला तेव्हा व आज देण्यात येत असलेले राजकीय रंग बघता हा चित्रपट केवळ एक ‘कलाकृती’ नसून, यामागे वेगळ्या प्रकारचे ‘राजकारण’ आहे आणि त्याची चर्चा करणे गरजेचे आहे.