मादी कासवे परतली
नेवरे, भाट्ये आणि आडे या किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी आलेल्या सागरी कासवाच्या माद्या अंडी न घालता परतल्याची नोंद करण्यात आली आहे. रत्नागिरी तालुक्यातील नेवरे किनाऱ्यावर यंदा प्रथमच कासवाची वीण होत आहेत. त्याठिकाणी ११ घरटी आढळून आली आहेत. मात्र, अशा परिस्थितीत त्याठिकाणी बंधाऱ्याचे काम किनाऱ्याच्या मध्यभागी सुरु झाल्याने अंडी घालण्यासाठी येणाऱ्या मादी कासव परतत आहेत. भाट्ये किनाऱ्यावर देखील अशीच परिस्थिती आहेत. त्याठिकाणी गतवर्षी आठ घरटी सापडली होती. दापोली तालुक्यातील आडे किनाऱ्यावर बंधाऱ्याचे काम सुरू असल्यामुळे अजून एक कासव अंडी घालण्यासाठी आलेले नाही. दरम्यान येत्या काळात वारे, गुहागर, कोळथरे, कर्दे, मुरुड, लाडघर या किनाऱ्यांवर बंधारा बांधण्याचे काम सुरू होणार आहे. त्यामुळे याठिकाणी सागरी कासवांना केंद्रस्थानी ठेवून बंधाऱ्याचे काम होणे अपेक्षित आहे.