मुंबई : (Hindu Sammelan) हिंदू संमेलने (Hindu Sammelan) ही सामाजिक समरसता आणि हिंदू चेतनेचा जिवंत उत्सव आहेत. त्यांचा उद्देश हिंदू समाजाला संघटित करणे हा आहे. या उपक्रमाचा सकारात्मक प्रभावही आता स्पष्टपणे दिसून येत आहे. अजमेर जिल्ह्यातील कल्याणीपुरा गावात भगवान देवनारायण यांचे मंदिर आहे. येथे दरवर्षी माघ शुक्ल सप्तमीला भगवान देवनारायणांचा जन्मोत्सव साजरा केला जातो आणि भव्य शोभायात्रा काढली जाते, ज्यामध्ये संपूर्ण गुर्जर समाज सहभागी होतो. मात्र यंदाची माघ शुक्ल सप्तमी रोजी निघालेली शोभायात्रा नेहमीपेक्षा वेगळी आणि विशेष ठरली. या शोभायात्रेत सर्व हिंदू समाजातील विविध जातींचे इंद्रधनुष्यी रंग पाहायला मिळाले. शोभायात्रेचा समारोप मंदिरात झाल्यानंतर जातिभेद न मानता सर्व जातीतील भाविकांनी मंदिरात प्रसाद अर्पण केला आणि भगवानांसमोर मस्तक टेकवले. यापूर्वी येथे सर्व जातींना प्रसाद वितरित केला जात असला तरी प्रसाद अर्पण करण्याचा मान केवळ गुर्जर समाजालाच होता.(Hindu Sammelan)
अशी माहिती आहे की, हे सर्व हिंदू सम्मेलन समिती आणि मंदिराचे पुजारी सुरेश भडाणा यांच्या प्रयत्नांमुळे शक्य झाले. कल्याणीपुरामध्ये हिंदू सम्मेलन आयोजित करण्याचा विचार मांडला गेला तेव्हा सर्वांनी मिळून निर्णय घेतला की यावेळी शोभायात्रेच्या गावात प्रवेश करताना सर्व हिंदू समाज तिचे स्वागत करेल आणि नंतर शोभायात्रेत सहभागी होईल. त्यानंतर मंदिरातच हिंदू संमेलनाचे (Hindu Sammelan) आयोजन करण्यात येईल. या निर्णयाचे सर्वांनी आनंदाने स्वागत केले आणि तयारीला लागले.(Hindu Sammelan)
शोभायात्रा गावाच्या सीमेवर पोहोचताच शिवमंदिराचे पुजारी अशोक यांच्या नेतृत्वाखाली सर्व हिंदू समाजातील नागरिकांनी पुष्पवृष्टी करून तिचे स्वागत केले. मेघवाल गोरा कुटुंबीयांनी गावाच्या मुख्य प्रवेशद्वारावर सर्वांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था केली. शोभायात्रा पुढे सरकताच गावातील दोनशेहून अधिक कलशधारी महिलांनी तिचे स्वागत केले. त्यानंतर सर्वजण शोभायात्रेत सहभागी होऊन मंदिरात पोहोचले, जिथे सर्व भाविकांनी ध्वज अर्पण केला आणि भगवानांना प्रसाद अर्पण केला.(Hindu Sammelan)
मंदिर प्रांगणातच हिंदू सम्मेलनाचे आयोजन करण्यात आले. व्यासपीठावर गावातील प्रत्येक जातीचे प्रतिनिधित्व दिसून आले, ज्यामुळे सामाजिक समरसतेची भावना अधिक दृढ झाली. या प्रसंगी पुजारी सुरेश यांनी सांगितले की सर्व हिंदू एक आहेत. भगवान देवनारायणांसह सर्व अवतार हे जन-जनाचे आराध्य आहेत; त्यांना जातीच्या चौकटीत बांधता येत नाही. वाढत्या धर्मांतराच्या घटनांबद्दल चिंता व्यक्त करत त्यांनी सांगितले की वर्षातून दोनदा जरी अशा प्रकारे हिंदू समाज एकत्र आला, तर नव्या पिढीला कोणत्याही विधर्मी षड्यंत्रापासून वाचवता येईल. मंदिर प्रांगणातच दोन हजारांहून अधिक हिंदू भाविकांनी कोणताही भेदभाव न करता एकाच पंगतीत बसून भोजन-प्रसाद ग्रहण केला. हे क्षण सर्वांसाठी अविस्मरणीय ठरले.(Hindu Sammelan)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक