
अंदमान निकोबार ची राजधानी पोर्टब्लेयर ( श्रीविजयपुरम ) येथे महाराष्ट्र मंडळ तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396 व्या जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.त्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ना. रामदास आठवले बोलत होते. (Chhatrapati Shivaji Maharaj)
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पोर्टब्लेयर चे नाव बदलून श्रीविजयपुरम असे नवे नाव दिले आहे. श्रीविजयपुरम च्या समुद्रकिनारी नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी आझाद हिंद सेने तर्फे सर्वप्रथम तिरंगा राष्ट्रध्वज उभारला त्या ऐतिहासिक फ्लॅग पॉइंट वर छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव आयोजित करण्यात आला होता. यावेळी अंदमान निकोबार चे खासदार विष्णू पद रे; जिल्हा परिषदेचे श्री अधिकारी; रिपब्लिकन पक्षाचे अंदमान निकोबार प्रदेश अध्यक्ष राहुल राम; प्रमोद काकडे; महाराष्ट्र मंडळाचे गोपीनाथ पाटील; सुनीता पाटील; नगरसेविका विनिता मल्होत्रा ; प्रोतिमा बॅनर्जी; प्रीती सुनील आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. (Chhatrapati Shivaji Maharaj)
छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमीकावा या युद्धतंत्राने अनेक लढाया जिंकल्या. त्यांनी शिस्तबद्ध सैन्य उभारले.त्यांच्या सैन्यात सर्व जाती धर्माचे मावळे होते.छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात कोणताही जातीभेद धर्मभेद नव्हता.त्यांनी राष्ट्रीय आणि सामाजिक एकता देशाला शिकविली आहे.त्यामुळे आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त एकता रॅली काढून अंदमान निकोबार च्या महाराष्ट्र मंडळाने स्तुत्य उपक्रम केला असल्याचे सांगत ना. रामदास आठवले यांनी संयोजकांचे केले. (Chhatrapati Shivaji Maharaj)
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त संपूर्ण पोर्टब्लेयर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली.या मिरवणुकीला एकता रॅली नाव देण्यात आले होते.या एकता रॅली ला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आणि अंदमान निकोबार चे खासदार पद रे यांच्या हस्ते दुपारी हिरवा झेंडा दाखविण्यात आला. या रॅलीचे संध्याकाळी फ्लॅगपॉईंटवर सभेत रुपांतर झाले.यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते अर्पण करून शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मराठी सह सर्व भाषिकांनी मराठी वेशभुषा करून सांस्कृतिक कार्यक्रम ही सादर करण्यात केले.यावेळी वंदे मातरम् हे राष्ट्रीय गीत उत्कृष्टपणे सादर करण्यात आले. (Chhatrapati Shivaji Maharaj)