Mumbai Climate Week: मुंबई क्लायमेट वीकमध्ये 'फ्युचर सिटीज अॅड इंटरलिंक्ड रिअॅलिटीज' वर सविस्तर चर्चा

    19-Feb-2026
Total Views |

 
Mumbai Climate Week 

मुंबई: (Mumbai Climate Week) मुंबई क्लायमेट वीक २०२६ च्या दुसऱ्या दिवशी, १८ फेब्रुवारी रोजी 'फ्युचर सिटीज, इंटरलिंक्ड रिअॅलिटीज: गवर्निंग क्लायमेट शॉक्स इन द ग्लोबल साऊथ' या विषयावर महत्त्वपूर्ण सत्र पार पडले. हे सत्र WRI इंडिया, H T परेख फाउंडेशन आणि इंडिया क्लायमेट कोलॅबोरेटिव्ह यांच्या सहयोगाने आयोजित करण्यात आले होते. (Mumbai Climate Week)

या सत्रासाठी न्यरिका होलकर (गोदरेज अँड बॉयसच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर), रोहिणी निलेकणी (रोहिणी निलेकणी फिलॅन्थ्रॉपीजच्या चेयरपर्सन), मारिया नेट्टो (ICS च्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर), आयुषी आशर (आशर ग्रुपच्या डायरेक्टर), शंकर देशपांडे (एमएमआरडीएचे चिफ इन्व्हेस्टमेंट अँड प्लॅनिंग ऑफिसर), माधव पाई (WRI इंडियाचे सीईओ) आणि अंशु भारद्वाज (नीती आयोग, भारत) हे मान्यवर उपस्थित होते. (Mumbai Climate Week)

सकाळी १०:४५ ते ११:४५ दरम्यान पार पडलेल्या या चर्चेत शहरांना परस्परसंबंधित हवामान धक्क्यांना (पूर, उष्णता लाटा, प्रदूषण आणि ऊर्जा संकट) तोंड देण्यासाठी शासन सुधारणा, डेटा-आधारित निर्णय, हवामान वित्तपुरवठा आणि नागरिक-राज्य सहकार्याचा एकात्मिक वापर कसा करावा यावर सखोल चर्चा झाली. (Mumbai Climate Week)

 हेही वाचा: Mumbai Climate Week 2026: ग्लोबल साऊथसाठी हरित गुंतवणुकीचा नवा मंत्र  

न्यरिका होलकर यांनी शहरी लवचिकतेसाठी खासगी क्षेत्राची भूमिका केवळ गुंतवणुकीपुरती मर्यादित नसून, टिकाऊ तंत्रज्ञान, ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर आणि हवामान-जोखीम मोजमापाच्या मानकांची अंमलबजावणी यामध्येही सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचे सांगितले. (Mumbai Climate Week)

रोहिणी निलेकणी यांनी शहरांना ‘सिस्टम्स ऑफ सिस्टम्स’ म्हणून पाहण्याची गरज अधोरेखित केली. डेटा-आधारित निर्णयप्रक्रिया, खुली माहिती प्रणाली आणि नागरिकांचा थेट सहभाग यामुळे शहरी नियोजन अधिक परिणामकारक होऊ शकते, असे त्यांनी सांगितले. (Mumbai Climate Week)

माधव पाई यांनी हवामान जोखमींचे स्वरूप लक्षात घेऊन अन्न प्रणाली, ऊर्जा संक्रमण आणि शहरी पायाभूत सुविधा यांचे एकत्रित नियोजन करण्याची गरज व्यक्त केली. डेटा-आधारित धोरणे आणि स्थानिक पातळीवरील कृती आराखडे यामुळे मेगासिटीज अधिक सक्षम बनू शकतात, असे ते म्हणाले. (Mumbai Climate Week)