उत्तन येथे २० वे राष्ट्रीय न्युरोथेरपी अधिवेशन

03 Jan 2026 12:15:59

20th National Neurotherapy Conference

मुंबई : ( 20th National Neurotherapy Conference ) डॉ. लाजपत राय मेहरा यांच्या न्युरोथेरपीची जागतिक महासंघ व आरोग्य भारती यांच्या संयुक्त विद्यमाने २० वे राष्ट्रीय न्युरोथेरपी अधिवेशन २-४ जानेवारी २०२६ या कालावधीत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, उत्तन येथे संपन्न होत आहे. या शैक्षणिक कार्यशाळेचे शीर्षक 'न्युरोथेरपी (निदानातील उत्कृष्टता)' असे असून यामध्ये विविध विषयांवरील वैज्ञानिक व्याख्याने तसेच न्युरोथेरपीद्वारे यशस्वीरित्या उपचार करण्यात आलेल्या आजारांवरील चर्चासत्र होणार आहे.
 

या कार्यशाळेच्या उद्घाटन सत्रात प्रमुख अतिथी आरोग्य भारती राष्ट्रीय संघटन सचिव डॉ. अशोक कुमार वार्ष्ण्येय, नामवंत ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर व राष्ट्रीय समन्वयक सुप्रजा संस्कार (आरोग्य भारती) डॉ. मधुरा कुलकर्णी उपस्थित होते. या कार्यशाळेला देशभरातून १५० पेक्षा जास्त न्यूरोथेरापिस्ट यांची उपस्थिती आहे.

हेही वाचा : Iran Crisis : इराणमध्ये महागाईविरोधात जनआक्रोश; आंदोलनांना हिंसक वळण, सात जणांचा मृत्यू
 
डॉ. मधुरा कुलकर्णी यांनी सांगितले की, ज्ञानशक्ती, इच्छाशक्ती, क्रियाशक्ती या तीन शक्तींच्या आधारावर आपण संकल्प केला पाहिजे आणि आपले विचार हे जगासमोर प्रस्तुत केले पाहिजेत. भाऊ तोरस्कर उपस्थितांना संबोधत म्हणाले की, न्यूरोथेरापिस्ट जे सुप्तावस्थेत आहे त्याला कार्यान्वित करायचं काम करतात. मनाची परिपक्वता ही भोजनापासून ते विचारावर निर्भर असते. ज्यावर उपचार करता त्याला स्वयंभू बनवायचे काम तुम्ही करत आहात. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला विश्वगुरू बनायचे आहे.
 

डॉ. अशोक कुमार वार्ष्ण्येय यांनी यावेळी सांगितले की प्रत्येक विधा, प्रत्येक शाखा ही एक पूर्ण विज्ञान आहे. केवळ रोगी व्यक्तीला ठीक करायचं एवढाच उद्देश नाही पण त्याच्या आनंदमय कोषापर्यंत पोचायचे हा मुख्य उद्देश आहे. आपण किती ही पुढे गेलो, तरी आपला आधार सोडायचा नाही. एक चिकित्सा पद्धतीची विशेषता सर्व चिकित्सा पद्धतींना माहिती हवी. त्यामुळेच इंटिग्रेशन करू शकतो. आज प्रत्येक स्थानी ट्रेनिंग सेंटर उभे करायची गरज आहे. दुसऱ्यांना शिकवल तर आपण स्वतः जास्त शिकू शकतो. रिसर्च ओरिएंटेशन - विश्लेषण करणे ही काळाची गरज आहे. अखंड परिश्रम करायची क्षमता असेल तरच तुम्ही आयुष्यात सफल होऊ शकता. सर्वे सन्तु निरामया: या वाक्यातील भाव जागृत करायची गरज आहे असे ही ते म्हणाले.

Powered By Sangraha 9.0