मुंबई : (Dattatreya Hosbale) भारतविरोधी शक्ती प्रत्येक क्षणी जागरूक राहतात. म्हणूनच कायदा हातात न घेता जागरूक राहणे आणि राष्ट्राचे रक्षण करण्यासाठी काम करणे हे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे (Dattatreya Hosbale) यांनी व्यक्त केले. ते बनारस हिंदू विद्यापीठाच्या स्वातंत्र्य भवन सभागृहात आयोजित युवा संवाद या कार्यक्रमात बोलत होते.(Dattatreya Hosbale)
युवकांसोबत संवाद साधताना ते (Dattatreya Hosbale) म्हणाले की, भारताबद्दल अनेक वेळा विकृत इतिहास मांडला जातो, परंतु प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये केवळ धार्मिक परंपरेचा संग्रहच नाही तर आज आपण ज्या ज्ञान परंपरेला आधुनिक विज्ञान म्हणतो त्याचा संग्रह देखील आहे. भारतीय साहित्यात धर्म, अर्थ, काम, मोक्ष यासारख्या सर्व विषयांवर चिंतन झाले आहे.(Dattatreya Hosbale)
ते (Dattatreya Hosbale) पुढे म्हणाले की, भारताला वसुधैव कुटुंबकम म्हणण्याचा नैतिक अधिकार आहे. कारण भारताने हजारो वर्षांच्या इतिहासात कधीही इतर कोणत्याही राष्ट्राचे शोषण केलेले नाही. शेकडो वर्षांपासून पारशी, यहुदी आणि तिबेटी निर्वासितांनी भारतात आश्रय घेतला आहे. परमपूज्य दलाई लामा यांनी भारताच्या संदर्भात म्हटले आहे की भारत हा गुरु आहे आणि तिबेट हा त्याचा शिष्य आहे.(Dattatreya Hosbale)
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. अजित चतुर्वेदी आणि काशी विभाग संघचालक प्रा. जयप्रकाश लाल उपस्थित होते.
जेव्हा तरुण विद्यार्थी सोशल मीडियावर बातम्या पाहतात तेव्हा त्यांना असे वाटते की, समाज वाईट लोकांनी भरलेला आहे. हा गैरसमज योग्य नाही. समाजात असे अनेक लोक आहेत जे सभ्यतेने वागतात आणि कौटुंबिक मूल्ये पुढे नेतात.(Dattatreya Hosbale)
बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.