मुंबई : (Amit Thackeray) महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर होऊन काही दिवस उलटले असले तरी अनेक नवनिर्वाचित नगरसेवक अद्याप आपल्या प्रभागात दिसून आलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित ठाकरे यांनी तीव्र शब्दांत टीका करत शिंदे गट आणि निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवर गंभीर सवाल उपस्थित केले आहेत. (Amit Thackeray)
निकाल लागल्यानंतर लोकप्रतिनिधींनी थेट आपल्या प्रभागात जाऊन मतदारांचे आभार मानणे, स्थानिक समस्या समजून घेणे आणि कामाला सुरुवात करणे अपेक्षित असते. मात्र प्रत्यक्षात अनेक नगरसेवक फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये ‘सुरक्षेच्या’ नावाखाली मुक्काम ठोकून असल्याचा आरोप अमित ठाकरे यांनी केला आहे. “जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी आज बंद दाराआड आनंदाने कैद आहेत,” अशी बोचरी टीका त्यांनी केली. (Amit Thackeray)
या प्रकारामागे नेमके कारण काय, असा सवाल उपस्थित करत अमित ठाकरे म्हणाले की, हा प्रकार स्वतःच्याच सहकाऱ्यांवरील अविश्वासामुळे आहे की स्वार्थी राजकारणातून निर्माण झालेल्या सत्तासंघर्षामुळे? या राजकीय पळवापळवीत मतदान करणाऱ्या सामान्य नागरिकांचा अपमान होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (Amit Thackeray)
“लोकांच्या हितापेक्षा स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी सुरू असलेला हा तमाशा आणि जनतेच्या पैशाची उधळपट्टी आता तरी थांबवा. ज्या जनतेने तुमच्यावर विश्वास ठेवला आहे, तिच्यासाठी काहीतरी करा,” असेही अमित ठाकरे म्हणाले. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला उधाण आले आहे. (Amit Thackeray)