सोनिया गांधींवर एफआयआर दाखल करण्याची याचिका, निकाल राखीव

10 Sep 2025 19:06:29

नवी दिल्ली,  दिल्लीच्या राऊस अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाने काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्यावर एफआयआर दाखल करण्याची विनंती करणाऱ्य़ा याचिकेवर निकाल राखून ठेवला आहे. याचिकेत असा दावा केला आहे की गांधी यांचे नाव भारतीय नागरिक होण्यापूर्वी, तीन वर्षांपूर्वीच मतदार यादीत समाविष्ट झाले होते.

राऊस अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचे अतिरिक्त मुख्य न्यायिक न्यायमूर्ती वैभव चौरसिया यांनी तक्रारदार विकास त्रिपाठी यांच्या वतीने वरिष्ठ अधिवक्ता पवन नारंग यांनी सादर केलेले मुद्दे ऐकल्यानंतर निकाल राखीव ठेवला.

त्रिपाठी यांनी आरोप केला की, गांधी यांचे नाव १९८० मध्ये नवी दिल्ली मतदारसंघाच्या मतदार यादीत समाविष्ट केले गेले होते, जरी त्या फक्त एप्रिल १९८३ मध्ये भारतीय नागरिक झाल्या होत्या. तक्रारदाराच्या मते, गांधी यांचे नाव १९८० मध्ये यादीत आले, १९८२ मध्ये काढण्यात आले आणि नंतर १९८३ मध्ये पुन्हा समाविष्ट केले गेले.

“त्यांचे भारतीय नागरिकत्व अर्ज एप्रिल १९८३ चा आहे. तरीही १९८० मध्ये नवी दिल्ली मतदारसंघाच्या यादीत त्यांचे नाव कसे समाविष्ट झाले? नंतर १९८२ मध्ये काढण्यात आले आणि १९८३ मध्ये पुन्हा प्रवेश केले गेले?” असे त्रिपाठींच्या वकिलांनी कोर्टात मांडले.


Powered By Sangraha 9.0