भारतीय सागरी किनारपट्टींवर ८ मेगा जहाजबांधणी क्लस्टर

Total Views |

मुंबई : भारत आपल्या देशांतर्गत जहाजबांधणी क्षमता वाढवण्यासाठी मोठी पावले उचलत आहे. भारताकडे असलेल्या विशाल किनारपट्टीवर आठ मेगा क्लस्टर विकसित करण्याची योजना केंद्र सरकारने आखली आहे. यापैकी पाच पूर्णपणे नवीन ग्रीनफील्ड प्रकल्प असतील, तर तीन प्रकल्पांमध्ये विद्यमान सुविधांचा विस्तार समाविष्ट असेल, असे एका अहवालात नमूद करण्यात आले आहे.

केंद्रीय जहाजबांधणी सचिव टीके रामचंद्रन यांनी एका इंग्रजी वृत्तमाध्यमाला सांगितले की, सरकारने पूर्व-सुरक्षित जमिनीच्या तुकड्यांसह आणि सर्व आवश्यक मंजुरींसह काही ठिकाणे अंतिम केली आहेत. हा उपक्रम आत्मनिर्भर भारत मोहिमेचा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्याचा उद्देश भारताला जहाजबांधणीत जागतिक आघाडीवर स्थान देणे आहे.

तसेच ते पुढे म्हणाले, "राज्यांनी सागरी क्लस्टर स्थापन करण्यात जलद प्रगती केली आहे. सर्व राज्य सरकारांनी मंजूर केलेल्या जमिनीच्या तुकड्यांसह प्रकल्प राबविण्यासाठी विशेष उद्देश वाहने तयार केली आहेत. या प्रकल्पांना रस्ते आणि रेल्वे कनेक्टिव्हिटीचा आधार आहे. ब्रेकवॉटर सुविधांसह समुद्रकिनारी पायाभूत सुविधा देखील विकसित होत आहेत," असेही त्यांनी सांगितले. रामचंद्रन म्हणाले की, आंध्र प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू, गुजरात आणि महाराष्ट्रात नियोजित पाच ग्रीनफील्ड क्लस्टर्समध्ये जहाज निर्मिती, उपकरणे उत्पादन, विक्रेते, बंकरिंग स्टेशन, विमा सेवा आणि जहाज भाडेपट्टा ऑपरेशन्स यांचा समावेश असलेली परिसंस्था उभारण्यात येईल.

अलिकडच्या काही वर्षांत जहाजबांधणीवर क्षेत्रावर संपूर्ण जगाने लक्ष केंद्रित केले आहे. जागतिक जहाजबांधणी बाजारपेठेत मेरीटाईम इंडिया व्हिजन २०३० आणि व्हिजन २०४७चे उद्दिष्ट २०३० पर्यंत भारताला पहिल्या १० जहाजबांधणी देशांमध्ये आणि २०४७ पर्यंत पहिल्या पाच देशांमध्ये स्थान देण्याचे आहे. देशांतर्गत जहाजांच्या ताफ्यात भारतीय निर्मित जहाजांचे प्रमाण सध्याच्या ५% वरून २०३० पर्यंत ७% आणि २०४७ पर्यंत लक्षणीय ६९% पर्यंत वाढवणे हे आहे, असे अहवालात म्हटले आहे.

जहाजबांधणी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दक्षिण कोरिया, जपान आणि स्कॅन्डिनेव्हिया मधील जहाजबांधणी केंद्रांनाही भेट देऊन संभाव्य भागीदारी आणि संयुक्त उपक्रमांचा शोध घेतला आहे. रामचंद्रन यांनी संकेत दिले आहेत की, भारतीय सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील खेळाडूंसोबत यापैकी काही जागतिक भागीदारी नजीकच्या भविष्यात जाहीर केल्या जाऊ शकतात. भारताला जागतिक जहाजबांधणी केंद्र म्हणून विकसित करण्याच्या व्यापक दृष्टिकोनाचा भाग म्हणून देशाच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवरील धोरणात्मक ठिकाणे ओळखण्याच्या सरकारच्या धोरणाचा यापूर्वीही अनेकदा उल्लेख झाला आहे. आर्थिक वर्ष २६च्या केंद्रीय अर्थसंकल्पात, देशांतर्गत जहाजबांधणी क्षेत्राला पाठिंबा देण्यासाठी अनेक प्रमुख उपाययोजना सुरू करण्यात आल्या.



गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121