मराठी न बोलल्याने भोकं पडतात का? केतकी चितळेचं वादग्रस्त विधान

    25-Jul-2025
Total Views | 30





मुंबई : राज्यात मराठी आणि हिंदी भाषेवरून वातावरण तापले असताना अभिनेत्री केतकी चितळे हिने एक वादग्रस्त विधान केले आहे. मराठी न बोलल्याने भोकं पडतात का? असा सवाल तिने केला आहे. या विधानानंतर तिच्यावर सर्वत्र टीका करण्यात येत आहे.राज्यात मराठी आणि हिंदी भाषेवरून वातावरण तापले असताना अभिनेत्री केतकी चितळे हिने एक वादग्रस्त विधान केले आहे. मराठी न बोलल्याने भोकं पडतात का? असा सवाल तिने केला आहे. या विधानानंतर तिच्यावर सर्वत्र टीका करण्यात येत आहे.

केतकी चितळेने एक व्हिडीओ पोस्ट करत मराठी भाषेच्या अभिजात दर्जावरही प्रश्न उपस्थित केला आहे. ती म्हणाली की, "अभिजात हा संस्कृत शब्द आहे. अभिजात म्हणजे स्वतंत्र असायला पाहिजे. दुसऱ्या भाषेवर आधारित नसली पाहिजे. हा क्रायटेरिया २०२४ मध्ये काढून टाकण्यात आला. मराठी, बंगाली आणि आसामी या भाषांनासुद्धा अभिजात दर्जा मिळावा यासाठी हा क्रायटेरिया काढण्यात आला. पण मी याच्या विरोधात आहे. जर तुम्हाला करायचंच आहे, तर सगळ्याच भाषांना दर्जा द्या.


"माझ्या जवळच्या व्यक्तीने मला सांगितले की, हिंदी आणि उर्दूलासुद्धा दर्जा नाही आहे. त्यामुळे त्यांनीसुद्धा भांडायला पाहिजे. पण ते का भांडतील? दर्जा पाहिजे, त्यामुळे फक्त असुरक्षितता वाटते. दर्जा मिळाला, त्याने काय झालं? आम्हाला दर्जा पाहिजे, दर्जा पाहिजे यामुळे असुरक्षितता आणखी वाढते. मराठीत बोल-मराठीत बोल, मराठी कसे येत नाही. अरे, तो बोलेल नाहीतर नाही बोलणार, त्याने काय मराठी भाषेचं नुकसान होतंय का? भोकं पडतायत का? नाही ना? तुम्ही तुमची स्वतःची असुरक्षितता दाखवत आहात. त्याने काय फरक पडतो? कोणाच्या आयुष्यात काही फरक पडत नाही." असे ती म्हणाली.


'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
बांग्लादेशातसूफी परंपरा धोक्यात! कट्टरपंथींचा हैदोस; देशाच्या सांस्कृतिक वारशालाही मोठा धक्का

बांग्लादेशातसूफी परंपरा धोक्यात! कट्टरपंथींचा हैदोस; देशाच्या सांस्कृतिक वारशालाही मोठा धक्का

बांग्लादेशमध्ये सूफीइस्लामशी निगडित पवित्र स्थळांवर इस्लामिक कट्टरपंथींनी हल्ले सुरू केल्याचे निदर्शनास आले आहे. हे हल्ले इतके भीषण आहेत की १०० पेक्षा जास्त मजार व दर्गे लक्ष्य बनले शेख हसीना यांच्या सरकारचा पडाव झाल्यानंतर या घटना आणखीन वाढल्या. मोहम्मद यांच्या अंतरिम सरकारने अद्याप त्यावर ठोस पावले उचलली नसल्याचे दिसून येत आहे. या हल्ल्यांमुळे केवळ धार्मिक स्थळांचे नुकसान होत नाही, तर देशाच्या सांस्कृतिक वारशालाही मोठा धक्का बसत आहे. शतकानुशतकेबांग्ला संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेली सूफी परंपरा आता धोक्यात..

देशाच्या विकासात प्रत्येकाचा वाटा हेच मोठे परिवर्तन - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांचे प्रतिपादन

देशाच्या विकासात प्रत्येकाचा वाटा हेच मोठे परिवर्तन - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांचे प्रतिपादन

"देशातील प्रत्येकजण अर्थव्यवस्थेसाठी, आपल्या समाजासाठी आणि विकासप्रक्रियेकरीता आपला वाटा उचलत आहे. हेच आपल्या देशात घडलेले सर्वात मोठे परिवर्तन आहे," असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी केले. शुक्रवार,दि.१९ रोजी नॅशनल स्टॉक एक्स्चेंज येथे ऑर्गनाईसद्वारे आयोजित आणि एनएसईच्या सहकार्याने 'अर्थायम- धार्मिक मॉडेल ऑफ डेव्हलपमेंट' या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंडित दीनदयाळजी उपाध्याय यांच्या 'एकात्म मानव दर्शन'च्या ६० व्या वर्षाचे स्मरण करत विचारप्..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121