मध्य रेल्वे प्रशिक्षणार्थींसाठी नवीन वसतिगृहाचे उद्घाटन

Total Views | 11

मुंबई, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांनी सिग्नल व टेलिकॉम प्रशिक्षण संस्था,भायखळा येथे भेट देत प्रशिक्षणार्थींसाठी नव्याने बांधलेल्या जयगड वसतिगृहाचे बुधवार,दि.२३ रोजी उद्घाटन केले. जयगड या वसतिगृहात ३६ सुसज्ज कक्ष/रूम्स, १४४ प्रशिक्षणार्थींच्या निवासाची क्षमता आहे. येथे व्यायामशाळा, मनोरंजन कक्ष, भोजन कक्ष आणि वाय-फाय सुविधा उपलब्ध आहे.

सिग्नल व टेलिकॉम प्रशिक्षण संस्था, भायखळा ही सिग्नल व टेलिकॉम कार्यशाळा भायखळा याचा भाग असून, दरवर्षी मध्य रेल्वे आणि पश्चिम मध्य रेल्वे या दोन झोनमधील सरासरी १५०० प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देते. सदर संस्था १९६८ मध्ये स्थापन करण्यात आली असून येथे दरवर्षी आलेल्या कारागीर व अभियंत्यांसाठी (इंजिनियरसाठी) १०० पेक्षा अधिक प्रशिक्षण अभ्यासक्रम आयोजित केले जातात.

या अभ्यासक्रमांमध्ये प्रारंभिक अप्रेंटिस कोर्स, फाउंडेशन कोर्स, रिफ्रेशर कोर्स, विशेष उपकरण कोर्स आणि कवचप्रशिक्षण यांचा समावेश आहे. या निरीक्षणावेळी मनिंदर उप्पल, प्रधान मुख्य सिग्नल व दूरसंचार अभियंता, अमरेन्द्र सिंग, मुख्य कार्यशाळा व्यवस्थापक, सिग्नल व टेलिकॉम कार्यशाळा, भायखळा, प्रधान विभागप्रमुख, विभागीय रेल्वे व्यवस्थापक (मुंबई विभाग) तसेच मध्य रेल्वेचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
बहुचर्चित रो रो सेवा एक सप्टेंबर पासून सुरू; दक्षिण आशियातील सर्वांत जलद रो-रो सेवा - मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची माहिती

बहुचर्चित रो रो सेवा एक सप्टेंबर पासून सुरू; दक्षिण आशियातील सर्वांत जलद रो-रो सेवा - मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची माहिती

गणेशोत्सव, होळी अशा विविध सणांनिमित्त कोकणवासीय कोकणात मुक्कामी जातात. त्यांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी राज्य शासनाने मुंबई ते (जयगड) रत्नागिरी आणि मुंबई ते (विजयदुर्ग) सिंधुदूर्ग रो-रो सेवा सुरू केली असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुंबई ते कोकण समुद्रामार्गे प्रवास करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या रो-रो सेवेची माहिती देण्यासाठी आज पत्रकार परिषदेचे मंत्रालयात आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोकणवासीयांना आणि पर्यटकांन..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121