मुंबई, सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव बदलून ‘ईश्वरपूर’ करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. या मागणीनुसार, राज्य सरकारने ‘ईश्वरपूर’ हे नाव निश्चित केले असून, हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. केंद्र सरकारकडून मान्यता मिळाल्यास इस्लामपूरचे नाव बदलून ‘ईश्वरपूर’ असे करण्यात येईल, अशी माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली.
“हा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असल्याने, प्रस्ताव शिफारशीसह केंद्राकडे सादर करण्यात आला आहे. मान्यता मिळाल्यानंतर ‘ईश्वरपूर’ हे नाव लागू करण्यात येईल”, असे भुजबळ यांनी निवेदनाद्वारे सांगितले.