मंदिरांचे नियंत्रण आणि व्यवस्थापन हिंदूंच्या हाती हवे : बजरंगलाल बागडा , जळगावात विहिंपच्या केंद्रीय प्रबंध समितीची आंतरराष्ट्रीय स्तरावरील बैठकीला सुरुवात

    18-Jul-2025   
Total Views | 11

जळगाव : देशातील जगप्रसिद्ध मंदिरांवर शासनाचे नियंत्रण असून, मंदिरांचे नियंत्रण व व्यवस्थापन हिंदूंकडे देऊन मंदिरात दान येणाऱ्या धनसंपत्तीचा उपयोग हिंदू समाजहितासाठीच व्हावा. तसेच व्यसनाधीन युवक देशासाठी गंभीर मुद्दा आहे. यासाठी बजरंग दल व दुर्गा वाहिनीतर्फे जनजागृतीपर विशेष अभियान राबविले जाईल. यांसह इतर विषयांवर जळगावातील केंद्रीय प्रबंध समितीच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील बैठकीत चर्चामंथन होऊन अभियानाची दिशा ठरविली जाईल, असे विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री बजरंगलालजी बागडा यांनी सांगितले.

जळगावच्या एमआयडीसी परिसरातील बालाणी लॉन्सच्या नवीन इमारतीत अखिल भारतीय विश्व हिंदू परिषदेच्या केंद्रीय प्रबंध समितीची आंतरराष्ट्रीय स्तरावरील बैठक होत आहे. यानिमित्त शुक्रवारी दुपारी बाजारांगलाल बागडा यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. याप्रसंगी विश्व हिंदू परिषदेच्या अखिल भारतीय प्रचार समितीचे विजय शंकर तिवारी, देवगिरी प्रांतमंत्री योगेश्वर गर्गे, भय्यालाल आदी उपस्थित होते.

बैठकीत आगामी दोन दिवसांत कोणकोणत्या विषयांवर चर्चामंथन होईल याविषयी बाजारांगलाल बागडा यांनी माहिती दिली. ते म्हणाले, बैठकीला केंद्रीय पदाधिकारी, क्षेत्रीय, सर्व प्रांतांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी असून, सुमारे ४०० पदाधिकारी उपस्थित राहतील. हिंदू समाजासमार अनेक आव्हाने आहेत. त्यांना समोरे जाण्याच्या दृष्टीने आगामी कार्यक्रम, अभियानाची रूपरेषा बैठकीत ठरविली जाईल.

पुढे ते म्हणाले, "देशभरातील प्रसिद्ध हिंदू मंदिरांवर राज्य व केंद्र शासनाचे नियंत्रण आहे. मंदिरांचे व्यवस्थापन व नियंत्रण पूर्णतः हिंदू समाजाकडे असावे. मंदिरात येणाऱ्या दान व देणगीरूपी धनसंपत्तीचा उपयोग फक्त हिंदू समाजाच्या कल्याणासाठी केला जावा. ब्रिटिशकालीन कायद्यांमध्ये बदल करून मंदिरे शासनाच्या नियंत्रणातून मुक्त व्हावीत."

युवकांमधील वाढती व्यसनाधीनता चिंताजनक असल्याचे सांगत ते म्हणाले, देशभरातील युवक व्यसनाच्या आहारी जात आहेत. हा विषय आता चिंताजनक झाला आहे. ही देशासमोर मोठी समस्या आहे. युवकांना व्यसनांपासून रोखण्यासाठी राष्ट्रव्यापी नशामुक्ती अभियान राबविले जाईल. अभियानाला अंतिम रूप देण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचे युवा संघटन, बजरंग दल, दुर्गा वाहिनी प्रामुख्याने सहभाग होईल. याअंतर्गत शाळा- महाविद्यालय व विविध समाजघटकांमध्ये जनजागृतीपर उपक्रम राबविले जातील. यासाठी शासन-प्रशासनासोबत समन्वय बैठका घेण्यात येतील.

जळगावात होत असलेल्या अखिल भारतीय विश्व हिंदू परिषदेच्या केंद्रीय प्रबंध समितीच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील बैठकीत हिंदू समाजहितासाठी मंदिरे शासन नियंत्रणमुक्त व्हावीत, युवकांना व्यसनांपासून रोखणे, धर्मांतर या प्रमुख मुद्यांसह विविध विषयांवर चर्चामंथन करीत, शासन-प्रशासनाशी चर्चा करून योग्य निर्णय घेण्यासाठी दिशा ठरविली जाणार आहे. त्यानंतर जनजागृती अभियानासह आवश्यक असल्यास शासन-प्रशासनाला निवेदने आणि आवश्यकतेनुसार आंदोलनही केले जाईल, असे बजरंगलालजी बागडा यांनी सांगितले

देशभरातील धर्मांतर रोखण्याची गरज

धर्मांतरासारख्या गंभीर मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले, बांगलादेशातून मोठ्या संख्येने घुसखोरी होत असून देशात धर्मांतरणाचे प्रकार वाढले आहेत. हिंदू समाजाची अस्मिता वाचविण्यासाठी अवैध पद्धतीने होणारे धर्मांतर रोखण्याची गरज आहे. अनेक हिंदू बांधवांना वेगवेगळी आमिषे, पैशांची आशा लावून धर्मांतर करण्यासाठी भाग पाडले जाते. ते षड्यंत्र आहे. यासाठी बजरंग दल व दुर्गा वाहिनी यांच्यातर्फे देशभर जनजागृती अभियान राबविले जात आहे. गोमातांचे संरक्षण, युवतींच्या संरक्षणासाठी बजरंग दल व दुर्गा वाहिनी कार्यरत आहेत.

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
सिगारेटच्या धुरामुळे दादरमधील रहिवासी त्रस्त, शेवटी लावावे लागले

सिगारेटच्या धुरामुळे दादरमधील रहिवासी त्रस्त, शेवटी लावावे लागले 'नो स्मोकिंग'चे फलक

गेल्या दोन वर्षांपासून मुंबईतील दादर पश्चिम येथील इंद्रवदन को-ऑप. हाउसिंग सोसायटीच्या आजूबाजूला सतत धुम्रपान चालू असल्याने लोक त्रस्त झाले होते. सोसायटीशेजारी एक कार्यालय आणि मॉल असून तिथे काम करणारे लोक दिवसभर सिगारेट ओढण्यासाठी सोसायटीच्या कुंपणाजवळ येतात. त्यांच्या धुराचा त्रास सोसायटीच्या प्रत्येक घरात जाणवतो. खिडक्या बंद करूनही धूर घरात येतो, त्यामुळे लहान मुलं, वृद्ध आणि आजारी व्यक्तींना विशेष त्रास होतो. त्यामुळे सोसायटीतील रहिवाशांनी आता आवाज उठवण्याचा निर्णय घेतला आहे...

पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया समोर! म्हणाल्या, प्रत्येक गोष्टीला वेळ...

पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया समोर! म्हणाल्या, "प्रत्येक गोष्टीला वेळ..."

(Rohini Khadse Breaks Silence After Husband Pranjal Khewalkar’s Arrest) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पुण्यातील खराडी येथे सुरू असलेल्या रेव्ह पार्टीतून अटक करण्यात आली. पुणे पोलिसांनी रविवारी मध्यरात्री ही कारवाई केली. प्रांजल खेवलकर यांच्यावर ही रेव्ह पार्टी आयोजित केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्टीदरम्यानचा व्हिडीओ पुढे आल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर आता रोहिणी खडसे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांन..

पहलगाम हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, दहशतवादी पाकिस्तानचे की भारतातच...

पहलगाम हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, "दहशतवादी पाकिस्तानचे की भारतातच..."

(P Chidambaram's Remark on Pahalgam Terror Attack) पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून मे महिन्यात ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले. यामध्ये भारताने हवाई हल्ले करत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त केले. यासंदर्भातच विरोधी पक्षांनी संसदेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चेची मागणी केली होती, जी सत्ताधाऱ्यांनी मान्य केली. मात्र संसदेत चर्चेपूर्वी, ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी एका मुलाखतीत केलेले वक्तव्य समोर आले आहे. ज्यावरुन मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121