मुंबई, राज्यात गोवंश आणि इतर प्राण्यांची अवैध हत्या वाढत असल्याचा मुद्दा उपस्थित करत, प्राणी रक्षण अधिनियमात सुधारणा करण्याची मागणी भाजप आमदार संजय केळकर यांनी बुधवारी विधानसभेत केली. औचित्याच्या मुद्द्याद्वारे बोलताना त्यांनी सांगितले की, गोवंश हत्येसाठी प्राण्यांची अवैधरित्या राज्याबाहेर वाहतूक केली जाते. काही प्रकरणांमध्ये पोलिसांनी पकडलेली जनावरे तस्करांना परस्पर विकल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.
आ. केळकर यांनी गोवंश हत्या आणि अवैध प्राणी वाहतूक रोखण्यासाठी कायद्यात कठोर तरतुदी करण्याची गरज व्यक्त केली. तसेच, गोवंशाच्या पालन-पोषणासाठी शासनाने अनुदान द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.
'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या आठ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. महाराष्ट्राचे राजकारण आणि त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. २०१४, २०१९ आणि २०२४ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वार्तांकन. २०१८ साली राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष वार्तांकनाचा अनुभव.