Actor Dheeraj Kumar Passes Away : ‘ओम नमः शिवाय’ मालिकेचे दिग्दर्शक, ज्येष्ठ अभिनेते धीरज कुमार कालवश

    15-Jul-2025
Total Views | 21
 
actor dheeraj kumar passes away
 
 
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता तथा टीव्ही मालिकेतील लोकप्रिय चेहरा धीरज कुमार यांचे वयाच्या ७९ व्या वर्षी निधन झाले आहे. सोमवारी त्यांना अस्वथ वाटू लागल्याने अंधेरीच्या कोकिलाबेन रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. परंतू, उपचारादरम्यान प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही.
 
काही काळापासून धीरज कुमार हे न्यूमोनियाने त्रस्त होते. हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अष्टपैलू कलाकार म्हणून धीरज कुमार यांची ओळख होती. सोमवार दि. १४ जुलै रोजी संध्याकाळी मंदिरात दर्शन घेऊन घरी परतल्यानंतर धीरज कुमार यांना अस्वथ वाटू लागले. दरम्यान, प्रकृती खूपच खालवल्याने त्यांना कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. धीरज कुमार यांच्या निधनाची बातमी ऐकताच हिंदी चित्रपटसृष्टीसह छोट्या पडद्यावर शोककळा पसरली आहे.
 
ओम नमःशिवाय मालिकेतून मिळाली लोकप्रियता
 
धार्मिक ग्रंथावर आधारीत १९९७ साली दूरदर्शनवर चॅनलवर आलेल्या 'ओम नमः शिवाय' या पौराणिक टीव्ही मालिकेचा यशस्वी दिग्दर्शक म्हणून धीरज कुमार यांना अफाट लोकप्रियता मिळाली.
 
अशी होती बहरदार कारकीर्द...
 
धीरजकुमार यांनी १९७० ते १९८४ दरम्यान जवळपास २५ ते ३० हिंदी- पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले होते. १९७४ साली आलेल्या 'रोटी कपडा और मकान' या चित्रपटातील त्यांची सहाय्यक अभिनेत्याची भुमिका खुप गाजली होती. 'सरगम', 'बहुरूपिया', 'हीरापन्ना','रातों का राजा' यांसारख्या चित्रपटांतून त्यांनी आपल्या बहरदार अभिनयाची छाप सोडली. याशिवाय त्याकाळातील हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते मनोज कुमार आणि झीनत अमान यांच्यासोबतही त्यांच्या सह-कलाकाराच्या भुमिकेला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला होता.
 
 
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
कल्याणमध्ये भाजपाचा पाणी टंचाईच्या विरोधात रास्ता रोको केडीएमसीच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे

कल्याणमध्ये भाजपाचा पाणी टंचाईच्या विरोधात रास्ता रोको केडीएमसीच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे

कल्याण पूर्वेतील काही परिसरात गेल्या अनेक महिन्यापासून नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा सहन कराव्या लागत असल्याने त्याविरोधात भाजपाने मंगळवारी आंदोलनाचे हत्यार उपसत मोर्चा काढला. भाजपाने महापालिकेच्या ड प्रभाग कार्यालयावर धडक दिली. यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी प्रभाग कार्यालयासमोरील कल्याण पूना लिंक रोडवर ठिय्या मांडून तब्बल तीन तास रास्ता रोको आंदोलन केले. महापालिकेच्या विरोधात नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. अखेर महापालिकेने पाणी टंचाई सोडविण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर भाजपाने रास्ता रोको आंदोलन ..

राज्य सहकारी संघ निवडणूकीत ‘सहकार पॅनेल’चे निर्विवाद वर्चस्व दरेकर-कुसाळकर-नलावडेंच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेलचे २१ पैकी २० उमेदवार विजयी

राज्य सहकारी संघ निवडणूकीत ‘सहकार पॅनेल’चे निर्विवाद वर्चस्व दरेकर-कुसाळकर-नलावडेंच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेलचे २१ पैकी २० उमेदवार विजयी

१०६ वर्षांची परंपरा लाभलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या २०२५-२०३० पंचवार्षिक निवडणुकीत आमदार प्रवीण दरेकर, राज्य सहकारी संघाचे नेते संजीव कुसाळकर आणि सहकारातील ज्येष्ठ नेते शिवाजीराव नलावडे यांच्या नेतृत्वाखालील ‘सहकार पॅनेल’ने २१ पैकी २० जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवित मोठा विजय संपादित केला आहे. महाराष्ट्रातील सहकार चळवळ पुन्हा ताकदीने कशी पुढे येईल यासाठी दिशादर्शक मार्गदर्शन करणारा संघ ठरेल, असा विश्वास यावेळी भाजपा गटनेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर यांनी व्यक्त केला...

भारतीय शौर्य पुन्हा एकदा उजेडात आणुया, चला

भारतीय शौर्य पुन्हा एकदा उजेडात आणुया, चला 'विजय दिवस साजरा करूया!

आपल्या दैदीप्यमान पराक्रमी इतिहासाच्या जोरावर प्रखर राष्ट्रभक्तीने जगभरात भारतीय संस्कृतीची अटल छाप सोडणाऱ्या माझ्या भारतीय बांधवांना 'विजय दिवसाच्या' हार्दिक ' शुभेच्छा! २६ जुलै १९९९ या दिवशी तत्कालीन पंतप्रधान श्रद्धेय दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात कारगिल मध्ये पाकिस्तानला युद्धात पराजित करून 'भारतीय शुर सैनिकांनी ऑपरेशन विजय' यशस्वी केले. तब्बल १८ हजार फूट उंचीवर भारतीय सैन्याने आपले शौर्य जगाला दाखवले होते. एवढ्या उंचीवर आणि उणे ४० अंश सेल्सिअस तापमानात लढले गेलेले हे युद्ध जगातील एकमेव ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121