बांग्लादेशी घुसखोरांविरोधात बीएसएफची मोठी कारवाई!

    14-Jul-2025   
Total Views | 18


मुंबई : बांग्लादेश-भारत सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोन घुसखोरांना सीमा सुरक्षा जवानांनी ठार मारल्याचे समोर येत आहे. गोतस्करीच्या हेतूने भारतात अवैधरित्या शिरणाऱ्या घुसखोरांविरोधातील ही मोठी कारवाई आहे. भारतीय जवानांनी सर्वप्रथम त्यांना इशारा देखील दिला, मात्र तेव्हाच घुसखोरांनी दगडफेक करत जवानांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. यावेळी झालेल्या चकमकील दोन घुसखोर ठार झाल्याची माहिती समोर येत आहे.


बांगलादेशच्या ठाकूर गाव येथून घुसखोरी करणाऱ्यांना जवानांनी सीमेलगत घेरले. गोतस्करीच्या हेतूने शफीकुल इस्लाम भारतात आला होता. त्याला व त्याच्या साथीदारांना भारतीय जवानांनी रोखले असता त्यांच्यावर दगडफेक करण्यास सुरूवात केली. त्यामुळे जवानांना गोळीबार करावा लागला. यात शफीकुल इस्लाम ठार झाला. जवानांनी त्यांचे मृतदेह बांग्लादेशला परत केले असून तेथील अधिकाऱ्यांनी गोळीबार न करण्याचे आवाहन केले आहे.



ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
काँग्रेसमधल्या

काँग्रेसमधल्या 'या' बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, महत्त्वाच्या पदावर पाणी सोडलं! सांगितलं 'हे' कारण...

(Anand Sharma Resigns As Chairman Of Congress Foreign Affairs Department) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी रविवारी दि. १० ऑगस्ट रोजी पक्षाच्या परराष्ट्र व्यवहार विभागाच्या (DFC) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आनंद शर्मा यांनी पक्षाची पुनर्रचना व्हावी आणि या पदावर तरुण नेत्याची निवड व्हावी, त्यासाठी आपण हे पद सोडत असल्याचे म्हटले आहे. माजी केंद्रीय मंत्री राहिलेले शर्मा प्रदीर्घ काळापासून या पदावर कार्यरत होते. मात्र आता त्यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता काँग्रेसला मोठा धक्का ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121