बंगळुरू: (G Madhavi Latha) जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे पूलाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी ६ जून रोजी करण्यात आले. या पूलाच्या बांधकामाने भारतीय अभियांत्रिकी क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगळुरूच्या एका प्राध्यापिकेने या पूलाच्या बांधकाम प्रकल्पासाठी गेली १७ वर्षे स्वतःला वाहून घेतले. आयआयएससी सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील रॉक इंजिनिअरिंग तज्ज्ञ जी. माधवी लता यांनी चिनाब पूलाच्या बांधकामात महत्त्वाची भूमिका बजावली.
चिनाब पुलाच्या बांधकामात माधवी लता यांनी प्रकल्प सल्लागार म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्या बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc) येथे प्राध्यापिका आहेत. आयआयएससी सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील रॉक इंजिनिअरिंग तज्ज्ञ जी. माधवी लता यांनी त्यांच्या आयुष्यातील जवळपास १७ वर्षे चिनाब पुलाच्या बांधकामासाठी समर्पित केली आहेत. चिनाब पुलाच्या कंत्राटदार अफकॉन्सच्या विनंतीवरून लथा यांनी पुलाच्या बांधकामाचे मार्गदर्शन केले. या काळात, त्यांनी पुलाच्या उताराचे स्थिरीकरण आणि पाया घालण्याचे नेतृत्व केले. पुलाच्या बांधकामादरम्यान माधवी लथा यांनी प्रकल्प सल्लागार म्हणून जबाबदारी स्वीकारली. सुरुवातीला, त्यांच्यासोबत प्रकल्प सल्लागार म्हणून आयआयएससीचा दुसरा अभियंता होता, परंतु काही वर्षांनी त्यांनी प्रकल्प सोडला, परंतु २०२२ पर्यंत पुलाचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत लथा यांनी त्यांची जबाबदारी स्वीकारली.
We are proud of Prof Madhavi Latha & her team's contribution to the #ChenabBridge inaugurated by Hon'ble PM Narendra Modi🎉 The team worked on stability of slopes, design & construction of foundations, design of slope stabilisation systems incl. rock anchors to withstand hazards. pic.twitter.com/BApCSJTRZX
चिनाब पूल बांधणाऱ्या अभियंत्यांचा दावा आहे की १,४८६ कोटी रुपये खर्चून बांधलेला हा पूल शतकाहून अधिक काळ टिकेल. हा पूल नैसर्गिक परिस्थितीचा सामना करण्यास सक्षम असेल. नदीच्या पात्रापासून ३५९ मीटर उंचीवर बांधलेला, चिनाब पूल कटरा आणि काझीगुंडमधील दोन टेकड्यांना जोडतो. हा जगातील सर्वात उंच रेल्वे आर्च ब्रिज आहे. हा पूल आयफेल टॉवरपेक्षा उंच आहे. त्याच वेळी, हा पूल अशा प्रकारे बांधण्यात आला आहे की तो ताशी २६६ किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांना तोंड देऊ शकतो आणि -२० अंश सेल्सिअस पर्यंत तापमान सहन करण्यास सक्षम आहे.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\