राज्यात ई-कॅबिनेटचा शुभारंभ! कागद विरहित प्रणालीद्वारे राज्य कारभार सुलभ होणार

24 Jun 2025 17:39:56


मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार, २४ जून रोजी ई-कॅबिनेटचा शुभारंभ करण्यात आला. 'ई-मंत्रिमंडळ : कागद विरहित भविष्यासाठी एक पाऊल' या उपक्रमांतर्गत मंत्रालयात पहिलीच ई-मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत मंत्र्यांना आयपॅडचे वाटप करण्यात आले.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते. दि. २ जानेवारी २०२५ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ई-कॅबिनेट प्रणाली राज्यात लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला होता. यामुळे प्रशासकीय कामकाज अधिक वेगवान, कागदविरहित आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित होणार आहेत.

शक्तीपीठ महामार्गास मंजूरी; महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियमात सुधारणा! मंत्रिमंडळ बैठकीतील ८ महत्वपूर्ण निर्णय; वाचा सविस्तर...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत आणि डिजिटल इंडिया अभियानाच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र शासनाने प्रशासन अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक करण्यासाठी ‘ई-मंत्रिमंडळ’ उपक्रमाची सुरूवात केली आहे. या उपक्रमामुळे शासन आणि नागरिक यांच्यातील दुरावा कमी होऊन डिजिटल माध्यमातून सेवा अधिक प्रभावीपणे पोहोचवता येणार आहे. ‘ई-मंत्रिमंडळ’ प्रणालीद्वारे मंत्रिमंडळ बैठकीचे नियोजन, संदर्भ शोध, निर्णयांची अंमलबजावणी आणि परीक्षण एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर सुलभतेने करता येईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.



Powered By Sangraha 9.0