जग आपल्यावर हसतयं! आपण युद्ध साजरं करतोय : संजय राऊत

    09-May-2025   
Total Views |
 
 
sanjay raut appeals to pm modi govt control propaganda in media
 
मुंबई : (Sanjay Raut) भारत आणि पाकिस्तान (India-Pakistan War) यांच्यातील तणाव सध्या शिगेला पोहोचला आहे. दोन्ही राष्ट्रांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर, नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याने, केंद्र सरकारने माध्यमांमध्ये पसरवल्या जाणाऱ्या माहितीच्या प्रचारावर अंकुश लावावा, असे प्रतिपादन उबाठा खासदार संजय राऊत यांनी शुक्रवार दि. ९ मे रोजी पत्रकारांशी बोलताना केले.
  
सशस्त्र दलांना पाठिंबा देण्याऐवजी युद्धाचा उत्सव साजरा करणाऱ्यांवरही त्यांनी टीका केली. "अशा वेळी माध्यमांमध्ये होणाऱ्या प्रचारावर सरकारने नियंत्रण ठेवले पाहिजे. अन्यथा, ते आपल्या सैन्याचे मनोबल कमी करेल. संपूर्ण जग आपल्यावर हसतंय. निवृत्त लष्करी जवानही म्हणत आहेत, 'काय चाललंय?' तथापि, त्यापैकी काही जण टीव्हीवर जाऊन क्रिकेटसारखे तज्ज्ञांचे भाष्य करत आहेत.
 
"युद्धाच्या काळात सरकार आणि भारतीय सशस्त्र दलांना पाठिंबा देणे ही नागरिकांची आणि राजकीय पक्षांची जबाबदारी आणि राष्ट्रीय कर्तव्य आहे. कारण युद्धभूमीवर आपण किंवा पंतप्रधान नाही तर आपली सशस्त्र दलं आहेत. जवान शहीद होत आहेत. दिनेश यादव शहीद झाले. संपूर्ण देशाने सैन्याला पाठिंबा दिला पाहिजे, ही आपली जबाबदारी आणि राष्ट्रीय कर्तव्य आहे," असे राऊत म्हणाले.
 
 

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\