राईटचा इंडिकेटर, लेफ्टवर प्रहार! मोदींची ही खेळी समजण्यात पाकिस्तान तिसऱ्यांदा अपयशी!

‘मॉक ड्रील’ची वाट पाहत बसले पाकिस्तानी, भारताने ‘सिंदूर’ने करुन दिली ‘उरी’-‘बालाकोट’ची आठवण

    07-May-2025
Total Views |

operation sindoor 
 
नवी दिल्ली:(Operation Sindoor) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या संपूर्ण ‘टीम इंडीया’ने सलग तिसऱ्यांदा पाकिस्तानला चकवा देत आंतरराष्ट्रीय स्तरावर उघडे पाडत पाकिस्तानला त्यांच्या घरात घुसून ठोकले आहे. जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी पर्यटकांना लक्ष्य करून केलेल्या दहशतवादी हल्ल्याला भारतीय लष्कराने जोरदार प्रत्युत्तर दिले. बुधवार दि. ७ मे रोजी मध्यरात्री ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी करत दहशतवाद्यांची नऊ ठिकाणे उध्वस्त केली. राष्ट्र प्रथम हे धोरण जागतिक स्तरावर वेगळी छाप पाडण्यात यशस्वी झाले. भारताने पाकिस्तानाला एकाच रात्री बालाकोट आणि उरी हल्ल्याची आठवण करुन दिली.
 
बालाकोट, सिंदुर ऑपरेशन आणि पंतप्रधान मोदी
 
भारताने २६ फेब्रुवारी २०१९ रोजी ‘बालाकोट स्ट्राइक’ केला होता पण त्याच्या ४८ तास आधी भारतात वातावरण एकदम सामान्य होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बालाकोटच्या पूर्वी राष्ट्रीय युध्द स्मारक देशाला समर्पित केले होते. बालाकोट स्ट्राईकसाठी रात्री नऊ वाजता, भारतीय विमाने उड्डाणासाठी सज्ज होत असताना, पंतप्रधान मोदी दिल्लीत एका मीडिया ग्रुपने आयोजित केलेल्या शिखर परिषदेला संबोधित करत होते. त्या परिषदेत मोदींनी भारताच्या आकांक्षा, विकास आणि दहशतवादाविरुद्धच्या दृढनिश्चयाबद्दल बोलले, परंतु जसजसा वेळ गेला तसतसे मोदी पूर्णपणे शांत आणि आत्मविश्वासू दिसू लागले.
 
याचप्रकारे काल मंगळवार दि. ६ मे रोजी एबीपी न्यूजच्या भारत @ २०४७ समिट या विशेष कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीत त्यांनी डिजिटल इंडिया आणि स्वावलंबी भारतासोबत सिंधू पाणी कराराचाही उल्लेख केला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, हे दशक येत्या शतकांसाठी भारताची दिशा ठरवणार आहे. देशाचा विकास, देशातील संसाधने कोणत्याही भेदभावाशिवाय शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचली पाहिजेत, हेच लोकशाहीचे खरे उद्दिष्ट आहे आणि आ. आपण जीडीपी-केंद्रित दृष्टिकोनाऐवजी जीईपी केंद्रित दृष्टिकोनाकडे वाटचाल करत आहोत. जीईपी म्हणजे - लोकांचे सकल सक्षमीकरण, म्हणजे सर्वांचे सक्षमीकरण करने या पंतप्रधान बोलत होते .या कार्यक्रमात पण पंतप्रधान मोदी शांत, संयमी आणि आत्मविश्वासू दिसू लागले.