'पिक्चर अभी बाकीं है...'; माजी लष्करप्रमुख मनोज नरवणेंची सूचक प्रतिक्रिया
07 May 2025 12:23:17
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Manoj Naravane on Operation Sindoor) भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पहलगाम दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत बुधवारी पहाटे भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमधील लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनांचे तळ क्षेपणास्त्र हल्ल्यांद्वारे उद्ध्वस्त केले. भारतीय सैन्याचे माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी 'पिक्चर अभी बाकीं है' म्हणत या प्रकरणावर सूचक प्रतिक्रिया दिलीय.
पाकिस्तानने भारतातील लष्करी प्रतिष्ठानांना लक्ष्य करून संघर्ष वाढवण्याचा निर्णय घेतला तर असे आणखी हल्ले शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २६ नागरिकांच्या क्रूर हत्याकांडानंतर धाडसी आणि सुनियोजित प्रत्युत्तर म्हणून, भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानी हद्दीत मोठ्या प्रमाणात लष्करी कारवाई सुरू केली. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताच्या दहशतवादविरोधी कारवाईला युद्धाचे कृत्य म्हणून वर्णन केले.