नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद्यांना उत्तर देण्याचा निर्णय घेतला म्हणून ७ मे २०२५ रोजी १:१७ वाजता पहिला हल्ला झाला आणि १:४४ वाजता मिशन सिंदूर पूर्ण झाले. हल्ला दहशतवाद्यांवर होता आणि या हल्ल्याने उत्कृष्ट कामगिरी केली. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री, भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी आणि भारतीय हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी बुधवारी मीडियाला ऑपरेशन सिंदूरबद्दल माहिती दिली.
भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी या सर्व सहभागी राष्ट्रांमध्ये एकमेव महिला कमांडर होत्या, आणि त्यानी बायोकेमिस्ट्रीमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे. कुरेशी यांना शांतता मोहिमेत मोठा अनुभव आहे व त्या २००६ मध्ये काँगोमधील भारतीय मिशनचा भाग होत्या. कर्नल कुरेशी या भारतीय लष्कराच्या सिग्नल कॉर्प्सच्या एक सन्मानित अधिकारी आहेत. बहुराष्ट्रीय लष्करी सरावात भारतीय लष्कराच्या तुकडीचे नेतृत्व करणारया पहिल्या महिला अधिकारी होण्याचा मान त्याना मिळाला आहे.
विंग कमांडर व्योमिका सिंग यांचे नेतृत्व
भारतीय हवाई दलातील हेलिकॉप्टर पायलट व्योमिका सिंग यांनी ऑपरेशन सिंदूरवर पत्रकार परिषदेचे नेतृत्व केले. २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हे हल्ले करण्यात आले होते, ज्यामध्ये २६ लोक मारले गेले होते. व्योमिका सिंग राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्स (एनसीसी) मध्ये सामील झाल्या त्यानी अभियांत्रिकीचा अभ्यास केला आणि नंतर सशस्त्र दलात सामील होणारया त्या कुटुंबातील पहिली व्यक्ती बनल्या.
विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी २५०० पेक्षा जास्त तास उड्डाण केले आहे. त्यानी जम्मू आणि काश्मीर आणि ईशान्येसारख्या उंचावरील भागांसह भारतातील काही सर्वात आव्हानात्मक प्रदेशांमध्ये चेतक आणि चित्ता सारखी हेलिकॉप्टर चालवली आहेत. विंग कमांडर सिंग अनेक बचाव मोहिमांचा भाग राहिले आहेत. नोव्हेंबर २०२० मध्ये, अरुणाचल प्रदेशात एका महत्त्वपूर्ण बचाव मोहिमेचे नेतृत्व केले, नागरिकांना बाहेर काढण्यासाठी उंचावरील, कठीण हवामान परिस्थितीत उड्डाण केले. या मोहिमेसाठी दुर्गम भागात तज्ञ उड्डाण कौशल्यांची आवश्यकता होती जिथे जीव वाचवण्यासाठी हवाई मदत अत्यंत महत्त्वाची होती.