दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबाच्या अंत्यसंस्काराला पाक सैन्याची उपस्थिती, पाकिस्तान-दहशतवादी एकत्रच! संयुक्त राष्ट्रांचे डोळे आता तरी उघडणार का?
07-May-2025
Total Views |
नवी दिल्ली : मसूद अझहर हा गेल्या अनेक वर्षांपासून भारतासाठी डोकेदुखी ठरला आहे. ७ मे २०२५ च्या रात्री, भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले आणि अझहरचा बालेकिल्ला असलेल्या बहावलपूरमधील जैशचे मुख्यालय उद्ध्वस्त केले. हा हल्ला २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर होता, ज्यामध्ये २६ लोक मारले गेले होते.
मसूद अझहर हा एक कुख्यात दहशतवादी आहे, जो पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद (जेईएम) चा संस्थापक आणि नेता आहे. मसूद अझहर भारताविरुद्ध अनेक मोठ्या दहशतवादी हल्ल्यांचा सूत्रधार आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने केलेल्या लक्ष्यित हवाई हल्ल्यात दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबातील १० सदस्य आणि त्याचे चार सहकारी मारले गेल्याचा दावा जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मौलाना मसूद अझहरने केला आहे.
१९९४ मध्ये भारतात अटक झालेल्या आणि एअर इंडिया आयसी ८१४ अपहरणानंतर सोडण्यात आलेल्या अझहरच्या नावाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की बहावलपूरमधील जामिया मस्जिद सुभान अल्लाह या जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयावरील हल्ल्यात मारल्या गेलेल्यांमध्ये त्याची मोठी बहीण, तिचा पती, एक पुतण्या आणि त्याची पत्नी, एक भाची आणि कुटुंबातील पाच मुले यांचा समावेश आहे.
प्रथम हरकत-उल-मुजाहिदीन (HuM) मध्ये सामील झाला, ज्याने अफगाणिस्तानात सोव्हिएत सैन्याविरुद्ध जिहाद लढला. आता ही संघटना कट्टर देवबंदी विचारसरणीचे पालन करते आणि भारतापासून काश्मीर हिसकावून पाकिस्तानात विलीन करण्याचे स्वप्न पाहते. २००१मध्ये जम्मू काश्मीरच्या विधानसभेवर हल्ला करण्यात आला होता. ज्यात एकूण ३८ जवान हुतात्मा झाले. २०१६ मध्ये पठाणकोट आणि उरी हल्ल्यात २७ सैनिक हुतात्मा झाले. २०१९ मध्ये पुलवामा हल्ल्यात एकूण ४० सीआरपीएफ जवान हुतात्मा झाले होते.
ऑपरेशन सिंदूरमध्ये, भारतीय हवाई दलाने बहावलपूरमधील जामिया मस्जिद सुभान अल्लाह संकुलाला लक्ष्य केले, जे जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय आणि मसूदचा बालेकिल्ला होता. यानंतर, कुटुंबातील १४ सदस्यांचा मृत्यू झाल्याची बातमी माध्यमांमध्ये आली आहे. ज्यामध्ये त्याची मोठी बहीण देखील समाविष्ट आहे. त्याचे चार सहकारी मारले गेल्याचा दावा जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मौलाना मसूद अझहरने केला आहे.
१९९४ मध्ये भारतात अटक झालेल्या आणि एअर इंडिया आयसी ८१४ अपहरणानंतर सोडण्यात आलेल्या अझहरच्या नावाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बहावलपूरमधील जामिया मस्जिद सुभान अल्लाह या जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयावरील हल्ल्यात मारल्या गेलेल्यांमध्ये त्याची मोठी बहीण, तिचा पती, एक पुतण्या आणि त्याची पत्नी, एक भाची आणि कुटुंबातील पाच मुले यांचा समावेश आहे. या घटनेनंतर दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबातील सदस्याच्या अंत्यसंस्काराला पाकिस्तानी सैन्य उपस्थित दिसले. याशिवाय पोलीस दलही यावेळी उपस्थित होते.