मुंबई : (CM Devendra Fadnavis On Operation Sindoor) काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या इस्लामिक दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक करण्यात आला आहे. भारताच्या या हवाई हल्ल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेदरम्यान प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी भारतीय सैन्य आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे.
भारत सहन करणार नाही, हे भारतीय सैन्याने पुन्हा एकदा दाखवून दिले!
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, "सर्व भारतीयांकरिता हा अभिमानाचा दिवस आहे आमच्यावर झालेला हल्ला हा भारत सहन करणार नाही. भारत त्याचा योग्य पद्धतीने बदला घेईल. हे हे भारतीय सैन्याने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. खरंतर ऑपरेशन सिंदूर हे नावच अधिक बोलकं आहे. म्हणून पुन्हा एकदा आपण सगळे मिळून भारतीय सैन्यदलाचे आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मन:पूर्वक अभिनंदन करुया. अतिशय नियोजनबद्ध हवाई हल्ला करून पाकिस्तान येथील दहशतवाद्यांचे ९ अड्डे पूर्णतः उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. यावेळी ते उद्ध्वस्त करतानाचे संपूर्ण शूटिंग उपलब्ध असल्यामुळे कोणाला पुरावा मागण्याची संधी उरलेली नाही."
भारत सहन करणार नाही, हे भारतीय सैन्याने पुन्हा एकदा दाखवून दिले! भारतीय सैन्यदलाचे हार्दिक अभिनंदन! पाकिस्तान येथील दहशतवाद्यांचे 9 अड्डे अचूकपणे एयर स्ट्राइक करून पूर्णतः उद्ध्वस्त केल्याबद्दल मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि सर्व देशवासीयांचे मन:पूर्वक अभिनंदन! ऑपरेशन सिंदुर हे… pic.twitter.com/zpXmz9BngA
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\