युद्धाच्या भितीने पाकिस्तानचा थरकाप; हजारो मदरसे अनिश्चित काळासाठी बंद, दहशतवाद्यांची ठिकाणेही हलवली

06 May 2025 13:10:02

Madrasas closed in Pakistan

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Madrasas closed in Pakistan) 
काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या इस्लामिक दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कडक पावले उचलण्यास सुरुवात केली. सिंधू करार रद्द करण्यापासून ते टपाल सेवा बंद करण्यापर्यंत अनेक धाडसी निर्णय भारताने घेतले. त्यामुळे युद्धजन्य परिस्थिती कधीही निर्माण होऊ शकते या भीतीने पाकिस्तान सध्या थरथर कापताना दिसतोय. पीओकेमध्ये कार्यरत असलेले त्यांचे दहशतवाद्यांची ठिकाणे रिकामी करण्यात आली आहेत. तिथे उपस्थित जिहादींनाही इतर ठिकाणी पाठवून त्यांना लपवण्यात आलेय. त्याचप्रमाणे, पाकिस्तान सरकारच्या आदेशानुसार, स्थानिक प्रशासन नियंत्रण रेषेच्या आसपासच्या धार्मिक मदरशांना देखील रिकामे करण्यात आल्याची माहिती आहे.

हे वाचलंत का? : चितगाव न्यायालयाचा आदेश, चिन्मय कृष्ण दास पुन्हा अटकेत

मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे एक हजार मदरसे रिकामे करण्याचे आणि त्यांना दहा दिवसांसाठी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र चित्र असे दिसते आहे की, सीमेजवळील मदरसे अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले आहेत. इस्लामाबादला भीती आहे की भारत काही प्रकारचा सर्जिकल स्ट्राईक करू शकतो आणि जर त्याने तसे केले तर त्याचे वरदान, म्हणजेच हे जिहादी आणि मदरशांमध्ये प्रशिक्षित होणारे नवशिक्या जिहादी नष्ट होऊ शकतात.

पाकिस्तान सरकार गेल्या तीन दिवसांपासून पीओकेमधील या भागात ही कारवाई करत आहे. 'धार्मिक शिक्षण' देणाऱ्या या मदरशांना दहा दिवस बंद ठेवण्यास सांगण्यात आले आहे. स्थानिक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या जिहादी हल्ल्यानंतर, त्यांना वाटते की भारतीय सैन्य बदला म्हणून लष्करी हल्ला करू शकते. आणि हे मदरसे आणि जिहाद कारखाने त्याचे लक्ष्य असतील.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, पीओजेकेच्या धार्मिक व्यवहार विभागाचे संचालक हाफिज नझीर अहमद यांनी पुष्टी केली आहे की प्रशासनाचे अधिकारी भारताकडून कठोर कारवाईबद्दल चिंतेत आहेत. सुरक्षा अधिकाऱ्यांना भीती आहे की 'भारतीय सैन्य मदरशांवर हल्ला करू शकते आणि त्यांना दहशतवादी प्रशिक्षण केंद्रे म्हणून सादर करू शकते'. याचा अर्थ असा की इस्लामाबाद अधिकाऱ्यांच्या माध्यमातूनही बनावट आणि खोट्या प्रचाराचे हे काम करून घेत आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून मदरसे बंद
भारतीय संतापाच्या भूतकाळातील अनुभवांमुळे पाकिस्तानचे सत्ताधारी आणि लष्करी अधिकारी घाबरले आहेत यात शंका नाही. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्यांना पीओकेमधील नियंत्रण रेषेजवळील दहशतवादी छावण्यांमध्ये वाढणाऱ्या प्रशिक्षणार्थी जिहादींबद्दल जितकी काळजी आहे तितकी जनतेची त्यांना वाटत नाही. नुकत्याच झालेल्या एका कैठकीत 'निष्पाप मुलांना धोक्यात घालू नये' असा एकमताने निर्णय घेण्यात आला. प्रशासनाच्या आकडेवारीनुसार, या प्रदेशात ४४५ नोंदणीकृत मदरसे आहेत, ज्यामध्ये २६,००० हून अधिक 'विद्यार्थी' शिक्षण घेतात. पीओके अध्यक्ष कार्यालयाने एक निवेदन जारी केले की सध्याच्या सुरक्षा परिस्थिती लक्षात घेता, खबरदारीचा उपाय म्हणून मदरसे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तथापि, पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील एक हजाराहून अधिक मदरसे सध्या बंद आहेत. लष्करी तणाव लक्षात घेता येथील नागरिकांना भूमिगत बंकर तयार करण्यास सांगण्यात आले आहे. शेकडो मदरशांमध्ये १० दिवसांची 'सुटी' जाहीर करण्यात आली आहे.

Powered By Sangraha 9.0