मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Islamists destroy Banyan tree in Bangladesh) बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना सत्तेवरून पायउतार झाल्यापासून बांगलादेश एका उन्मादाकडे वाटचाल करत आहे हे स्पष्ट आहे. इस्लामिक कट्टरपंथी लोक प्रत्येक विभागात, सामाजिक जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात वर्चस्व गाजवू पाहतायत. सरकारी किंवा सामाजिक पातळीवर घेतलेल्या निर्णयांवर प्रभाव पाडणे हा त्यांचा शरिया अधिकार मानतात. हिंदूंची प्रतिके धर्मांधांना एकतर धोकादायक वाटतात किंवा त्यास हराम म्हणून संबोधतात. हिंदूंसाठी पवित्र असलेले वडाचे प्राचीन झाड 'शिर्क' म्हणून तोडल्याचे निदर्शनास आले आहे.
हे वाचलंत का? : तैमूर नगर परिसरातील बेकायदा बांधकामांवर बुलडोझर; बांगलादेशींची १०० हून अधिक घरे जमीनदोस्त!
गेल्या ८ महिन्यांत इस्लामिक कट्टरपंथींनी बांगलादेशात हिंदूंचा अपमान आणि छळ करण्याचे अनेक कृत्य केले आहेत. अशी माहिती आहे की, त्या वटवृक्षाविरोधात धर्मांधांनी फतवा काढला होता. ही घटना मदारीपूर जिल्ह्यातील शिरखरा येथील अलामीर कांडी नावाच्या गावात घडली. हिंदू सणांमध्ये येथे २०० वर्ष जुन्या वटवृक्षाची पूजा करण्याची परंपरा खूप जुनी होती. या झाडांची खास सण-उत्सवात पूजा केली जाते. म्हणूनच स्थानिक धार्मिक कट्टरपंथीच्या मनात त्याबद्दल द्वेष होता. ज्यादिवशी फतवा निघाला, त्यानंतर काही लोक करवत घेऊन वटवृक्षापाशी पोहोचले आणि त्यांनी ते झाड मुळापासून उपटून टाकले. हिंदूंच्या आस्थेचे एक प्रतिक नष्ट केल्याचा आसुरी आनंद धर्मांधांना झाला होता.