जालियनवाला बाग हत्याकांडाचे क्रूर वास्तव जगासमोर आणायचे होते : करण सिंह त्यागी

    05-May-2025
Total Views |
 
reality of Jallianwala Bagh massacre to the world Karan Singh Tyagi
 
मुंबई: ( reality of Jallianwala Bagh massacre to the world Karan Singh Tyagi ) “केसरी 2’ चित्रपटाच्या निर्मितीची प्रक्रिया अद्भूत होती. या माध्यमातून मला जालियनवाला बाग हत्याकांडाचे क्रूर वास्तव जगासमोर आणायचे होते,” असे प्रतिपादन ‘केसरी 2’ चित्रपटाचे दिग्दर्शक करण सिंह त्यागी यांनी व्यक्त केले. मुंबईतल्या ‘वेव्हज समिट 2025’मध्ये ते बोलत होते.
 
मुंबईतल्या ‘जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर’ येथे आयोजित ‘वेव्हज समिट 2025’च्या तिसर्‍या दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांच्या अंतर्गत मनोरंजन क्षेत्रातील वेगवेगळ्या मान्यवरांच्या मुलाखती घेण्यात आल्या. याअंतर्गत ज्येष्ठ पत्रकार अलका सहानी यांनी ‘केसरी 2’चे दिग्दर्शक करण सिंह त्यागी यांची मुलाखत घेतली.
 
यामध्ये त्यागी म्हणाले की, “द केस दॅट शूक इंडिया’ या पुष्पा पलट आणि रघु पलट लिखित पुस्तकामुळे हा सिनेमा बनवण्याची प्रेरणा मला मिळाली. इंग्रजांनी जालियनवाला बागेमध्ये जो नरसंहार केला, तो पूर्वनियोजित होता. ब्रिटिश शासनाचे हे वास्तव सी. शंकरन नायर यांनी जगासमोर आणले. आपल्या येणार्‍या पिढीला हे वास्तव आणि त्या विरोधात दिलेला लढा याचा इतिहास कळायला हवा, म्हणून हा सिनेमा बनवला आहे. इतिहासाची ही अज्ञात पाने या चित्रपटामुळे उजेडात आली आहेत.”