नवी दिल्ली, सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी वक्फ (सुधारणा) कायदा, २०२५ ला आव्हान देणाऱ्या याचिकांची सुनावणी १५ मे रोजी भारताचे नियुक्त सरन्यायाधीश न्यायमूर्ती भुषण गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर ठेवली आहे.
भारताचे विद्यमान सरन्यायाधीश न्या. संजीव खन्ना १३ मे रोजी निवृत्त होत आहेत आणि न्यायमूर्ती गवई १४ मे रोजी सरन्यायाधीश पदाची शपथ घेतील. अंतरिम आदेश देण्यासाठीही दीर्घ सुनावणी आवश्यक असल्याचे सरन्यायाधीश खन्ना म्हणाले. त्यामुळे हे कारण त्यांनी हे प्रकरण न्यायमूर्ती गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर ठेवले आहे.
सुनावणीच्या सुरुवातीला सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सांगितले की त्यांनी केंद्राने दाखल केलेल्या प्रति-प्रतिज्ञापत्राचा आणि या प्रकरणात दाखल केलेल्या याचिकाकर्त्यांच्या प्रतिज्ञापत्रांचा आढावा घेतला आहे आणि वक्फ मालमत्तेच्या नोंदणीबाबत काही मुद्दे उपस्थित केले आहेत.