सिंधुदुर्ग : मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे बांधकाम पूर्ण झाले असून येत्या ११ मे रोजी या पुतळ्याचे अनावरण होणार असल्याची सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण होणार आहे.
सुप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनी या पुतळ्याचे काम केले असून यासाठी ३१ कोटी ७५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा ब्राँझ धातूने बनवण्यात आला असून महाराजांच्या हातात २३०० किलो वजनाची तलवार आहे. या पुतळ्याची उंच ८३ फूट इतकी आहे.
मालणवमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने राज्यभरात सध्या संतापाचे वातावरण होते. मात्र, राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेत पुन्हा नवा पुतळा उभारण्यास हालचाली सुरु केल्या. दरम्यान, आता या पुतळ्याचे बांधकाम पूर्ण झाले असून राजकोट येथे आधीपेक्षा अधिक आकर्षक आणि मजबूत अशा शिवरायांचा पुतळा उभारण्यात आला आहे. येत्या ११ मे रोजी या पुतळ्याचे अनावरण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.