मुंबई : मुंबईत पुढील काही दिवसांत तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारत हवामान विभागाने वर्तवला आहे. गेले काही दिवस शहरात पावसाने हजेरी लावली होती. बुधवारी २८मे रोजी पावसाचे प्रमाण कमी झाले. सांताक्रूझ वेधशाळेत १ मिमी आणि कुलाबा वेधशाळेत १७ मिमी पावसाची नोंद झाली.
बुधवारी सांताक्रूझमध्ये कमाल तापमान ३१.८ अंश सेल्सिअस, तर कुलाबामध्ये ३०.६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. हे तापमान सामान्यापेक्षा अनुक्रमे २.२ आणि ३.६ अंशांनी कमी होते. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील सहा दिवसांत कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते.
या वाढत्या तापमानामुळे शहरात उष्णता आणि आर्द्रता वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी. हवामान खात्याने यलो अलर्ट रद्द केला. सध्या पावसाचा इशारा दिलेला नाही. पुढील काही दिवसांत हवामानात बदल होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे.
मुंबईत यावर्षी मे महिन्यातच मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे तापमानात घट झाली होती. आता पावसाचे प्रमाण कमी होणार आहे. तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी उष्णतेपासून वाचण्यासाठी पुरेसे पाणी प्यावे आणि शक्यतो दुपारी घराबाहेर जाणे टाळावे.