नवी दिल्ली : दिल्ली आणि गुरुग्राममधील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. द्वारका एक्सप्रेसवेवरील बोगद्याचा ट्रायल २९ मेपासून सुरू झाला आहे. या बोगद्यामुळे वाहतूक कोंडी कमी होणार आहे. हा बोगदा द्वारका आणि इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जोडतो. बोगद्याची लांबी २.५ किलोमीटर आहे. ट्रायल दरम्यान दररोज ३ तास वाहतुकीस परवानगी दिली जाते. वेळ आहे दुपारी १२ ते ३.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने हा प्रकल्प विकसित केला आहे. प्रकल्पाची किंमत अंदाजे ९००० कोटी रुपये आहे. द्वारका एक्सप्रेसवेची एकूण लांबी २९ किलोमीटर आहे. त्यापैकी १०.१ किलोमीटर भाग दिल्लीमध्ये आणि १८.९ किलोमीटर भाग हरियाणामध्ये आहे. या बोगद्यामुळे NH-48 वरील ताण कमी होईल. गुरुग्राम आणि दिल्लीमधील प्रवास वेळ वाचणार आहे. खास करून मनसर ते इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतचा प्रवास आता ३० मिनिटांनी कमी होईल. यामुळे प्रवाशांचा वेळ आणि इंधन दोन्ही वाचणार आहे. या बोगद्यात फक्त चारचाकी आणि मोठी वाहनेच चालू शकतात. दुचाकी, तीनचाकी, ट्रॅक्टर, ट्रॉली, पाण्याचे टँकर आणि गॅस टँकरला प्रवेश नाही.
बोगद्यात विजेचे विशेष दिवे, हवेशुद्धीकरण यंत्रणा आणि इमरजन्सी एक्झिटसुद्धा आहेत. अपघात किंवा तांत्रिक अडचणींसाठी सीसीटीव्ही आणि सुरक्षारक्षक ठेवण्यात आले आहेत. ट्रायलनंतर बोगदा सर्वसामान्यांसाठी पूर्ण वेळ खुला केला जाईल. या प्रकल्पामुळे दिल्ली आणि गुरुग्राममधील हजारो प्रवाशांना दिलासा मिळेल. वेळ वाचेल आणि प्रवास अधिक आरामदायक होईल. एनएचआय लवकरच अधिक भाग पूर्ण करून सर्व मार्ग सुरळीत सुरू करणार आहे.