भारतातून पाकिस्तानात गेलेल्या मोहाजीर समुदायाने केली मोदींकडे ‘ही’ मागणी! म्हणाले, “पाकिस्तानमध्ये आमच्यावर...”

28 May 2025 18:31:05
Pakistani Muhajir asking for Narendra Modi

लंडन : पाकिस्तानी मोहजीर समुदायावर होणाऱ्या अन्यायाविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी करण्यात आली आहे. मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंटचे नेते अल्ताफ हुसेन यांनी पंतप्रधान मोदींनी यात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. “पाकिस्तानमध्ये मोहाजिर समुदायावर अन्याय होत आहे. हा विषयावर आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा करावी,” अशी विनंती त्यांनी मोदींना केली आहे.

अल्ताफ हुसेन लंडनमध्ये स्थायिक आहेत. त्यांनी व्हिडिओद्वारे ही मागणी केली आहे. ते म्हणाले, “पाकिस्तानमध्ये आमच्यासोबत क्रूरता केली जाते. मोहाजीर समाजाचे आयुष्य धोक्यात आहे. त्यांना आता भारताकडून मदतीची अपेक्षा आहे. कृपया यात मोदींनी हस्तक्षेप करुन न्याय द्यावा, असेही ते म्हणाले.

मोहाजीर म्हणजे कोण?


मोहाजीर म्हणजे १९४७ मध्ये भारतातून पाकिस्तानात गेलेले नागरीक. यांना आजही पाकिस्तानमध्ये संपूर्ण अधिकार मिळालेले नाहीत, असे अल्ताफ हुसेन म्हणाले. मोहाजिरांना सरकारी नोकऱ्या, शिक्षण आणि इतर सुविधा मिळत नाहीत. अल्ताफ हुसेन म्हणाले, "मोहाजिर लोक भारताला आपले मूळस्थान मानतात. भारताने आमच्यासाठी आवाज उठवावा. पंतप्रधान मोदींनी संयुक्त राष्ट्र, युरोपियन युनियन आणि इतर जागतिक मंचांवर मोहाजिरांची म्हणणे काय आहे ते व्यक्त करावे."


“पाकिस्तान सरकार मोहाजिर लोकांवर खोटे गुन्हे दाखल करते. त्यांच्यावर अत्याचार केला जातो. अनेक मोहाजिर बेपत्ता आहेत. काहींना तुरुंगात टाकले आहे. माझी मोदींना विनंती आहे की, ते मोहाजिर समाजासाठी न्याय मागावा.”, अशी मागणी त्यांनी केली आहे. पाकिस्तान सरकारने मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट आणि अल्ताफ हुसेन यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. अल्ताफ सध्या ब्रिटनमध्ये राहतात आणि तेथूनच मोहाजिर समुदायासाठी त्यांनी ही मागणी केली आहे. ही घटना आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि सोशल मिडीयावर चर्चेचा विषय झाला आहे. भारत सरकारकडून यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
Powered By Sangraha 9.0