एसएनडीटी महिला विद्यापीठात पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरु!

    24-May-2025
Total Views | 26
 
SNDT Womens University
 
मुंबई : एसएनडीटी महिला विद्यापीठात पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून दिनांक १४ जून २०२५ ही प्रवेशासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. इच्छूक विद्यार्थिनींना कला, वाणिज्य, विज्ञान आणि व्यवस्थापन या शाखांमध्ये प्रवेश करता येणार आहे.
 
चर्चगेट येथील एसएनडीटी कॉलेज ऑफ आर्ट्स आणि एस. सी. बी. कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स या कॉलेजमध्ये प्रवेशप्रक्रिया सुरु झाली आहे. या कॉलेजमध्ये उपलब्ध शाखा आणि विषय पुढीलप्रमाणे आहेत.
 
 
कला शाखा : इंग्रजी, मराठी, हिंदी, संस्कृत, गुजराती, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, भूगोल, मानसशास्त्र, संगीत, आर्ट अँड पेंटिंग
 
वाणिज्य शाखा : अप्रेंटनशिप इम्बेडेड कोर्सेस, बँकिंग व वित्तीय व्यवस्थापन, क्रिप्स बाफी, कंप्यूटर एप्लिकेशन, पर्यटन
विज्ञान शाखा : बी.एससी. आय.टी., मॅथ्स
 
व्यवस्थापन शाखा : बी.एम.एस. (AICTE आणि UGC मान्यता प्राप्त)
 
प्रमुख महत्वाच्या सुविधा कोणत्या?
 
कौशल्य विकास, संशोधन, चेतना कोर्सेस आणि उद्योजकता विकास
क्षेत्रभेटी, कार्यशाळा आणि प्रकल्प शिक्षण
शिष्यवृत्ती आणि आर्थिक सहाय्य उपलब्ध
अद्ययावत जिम, वसतीगृह, कौन्सिलिंग सेवा
एनसीसी, एनएसएस, सांस्कृतिक कार्यक्रम आणि १२हून अधिक क्रीडा प्रकारांमध्ये सक्रिय सहभाग
विद्यार्थीमुख अध्यापन आणि तज्ञ प्राध्यापकांची टीम
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) अंतर्गत अभ्यासक्रम रचना
 
प्रवेश प्रक्रिया २०२५-२६
 
प्रवेश सुरू होण्याची तारीख : २१ मे २०२५
प्रवेशाची अंतिम तारीख : १४ जून २०२५
मेरिट यादी जाहीर होण्याची तारीख : २० जून २०२५
https://sndt.digitaluniversity.ac/ या वेबसाईटवरून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया करता येईल.
 
प्रवेशासाठी कुठे संपर्क कराल?
 
दूरध्वनी : 022-22093789 / 22031879 
ईमेल : office@collegemumbai.sndt.ac.in
वेबसाईट : https://sndtcollegechurchgate.in
फेसबुक : https://www.facebook.com/share/1EwEUHY6Ln/?mibextid=wwXIfr
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
ठाणे- बोरिवली प्रकल्प बोगद्याची लांबी वाढविण्याचा निर्णय बोगदा मुल्लाबाग ऐवजी सत्यशंकरच्या भिंतीपर्यंत वाढवण्यात येणार

ठाणे- बोरिवली प्रकल्प बोगद्याची लांबी वाढविण्याचा निर्णय बोगदा मुल्लाबाग ऐवजी सत्यशंकरच्या भिंतीपर्यंत वाढवण्यात येणार

ठाणे- बोरिवली बोगदा प्रकल्पामुळे ठाण्यातील मुल्लाबाग येथील इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना होणारा त्रास दूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे-बोरिवली दरम्यान बनणारा बोगदा मुल्लाबाग ऐवजी सत्यशंकरच्या भिंतीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे स्थानिक रहिवाशांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार आहे.तसेच त्यांना होणारा धूळ आणि ध्वनी प्रदूषणाचा त्रास कमी करण्यासाठी बंदिस्त केलेल्या कन्व्हेयर बेल्टद्वारे राडारोडा वाहून नेण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121