पाकड्यांकडून वंशविच्छेदचा व्यापक कट!

24 May 2025 17:00:20

Mir Yar Baloch on Pakistan

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Mir Yar Baloch on Pakistan)
बलुचिस्तानातील लोकांनी स्वतःला पाकिस्तानपासून वेगळे म्हटले असून स्वतंत्र देश म्हणून घोषित केले आहे. पाकिस्तानकडून बलुच जनतेला लक्ष्य करण्याचा प्रयत्न मोठ्याप्रमाणात होतोय. मीर यार नामक एका मोठ्या बलुच नेत्याने बलुचिस्तान स्वातंत्र्याची घोषणा केल्यानंतर पाकिस्तान-बलुचिस्तानातील संघर्ष चांगलाच पेटलाय. गंभीर म्हणजे मीर यार यांनी दि. २४ मे रोजी आपल्या एक्स अकाऊंटवर केलेल्या पोस्टने पाकिस्तानचे अमानवी कृत्य आणि त्याची हिंसक वृत्ती पुन्हा उघडकीस आलीय. 'बलुच लोकांना गॅस गळती करून ठार मारले पाहिजे, आणि तेथील आईच्या गर्भात असलेल्या बाळांनाही ठार केले पाहिजे', असे विकृत विचार पाकिस्तानच्या पंजाप प्रांतातून व्यक्त होत असल्याचा खुलासा मीर यार यांनी आपल्या ट्विट मधून केलाय.

हे वाचलंत का? : संतापजनक! तिरुपती बालाजी मंदिरात धर्मांधाने पढला नमाज; 'TTD'चेही मौन

त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाच्या आणि मानवी हक्क संघटनांच्या हे निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केलाय की, पाकिस्तानच्या अतिक्रमणकारक सैन्य दलांनी ज्यामध्ये नौदल, स्थलसेना, वायुदल, आयएसआय, सैन्य गुप्तचर विभाग, लेव्हीज, फ्रंटियर कॉर्प्स, विशेष दल व एसएसजी कमांडोजचा समावेश आहे, त्यांनी पाक व्याप्त बलोचिस्तान (पीओबी) प्रदेशात व्यापक हालचाली सुरू केल्या आहेत. रावळपिंडीचा एका लष्करप्रमुख बलुचिस्तान-पाकिस्तान युद्धाचे नियंत्रण करत असल्याचे मीर यार बलूच यांनी म्हटलेय.

पुढे त्यात म्हटले आहे की, बलुचिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात लष्करी कारवाया, हवेतून बॉम्बहल्ले आणि जमिनीवर हल्ल्यांची योजना आखली जात आहे, ज्यामुळे व्यापक नरसंहाराची शक्यता निर्माण झाली आहे. पाकिस्तानी सरकारच्या दबावाखाली असलेल्या माध्यमांना लष्करी हालचाली व स्थानिक जनतेवर होणाऱ्या अत्याचारांची बातमी देण्यास मनाई करण्यात आली आहे. विशेषतः पंजाब प्रांतातील युद्धमाफिया व श्रीमंत वर्ग पाकिस्तानी सैन्याला बलुच जनतेविरुद्ध अमानुष कारवाया सुरू करण्यास खुलेआम प्रोत्साहन देत आहेत.

भारताकडून कोणताही धोका वाटत नाही
पाकिस्तानचा इतिहास आणि धोरणे दहशतवादाच्या वापरावर आधारित असून, त्याचे अण्वस्त्र कार्यक्रम जागतिक शांततेसाठी गंभीर धोका निर्माण करतात. म्हणूनच आम्ही आंतरराष्ट्रीय अणुशक्ती संस्था व संयुक्त राष्ट्र संघास पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचा तातडीने ताबा घेण्याची विनंती करतो, कारण बलुचिस्तान, सिंधुदेश आणि पख्तुनिस्तानमधील लोकांना भारताकडून कोणताही धोका वाटत नाही आणि त्यांना त्यांच्या भूमीवर अण्वस्त्रे नको आहेत. आम्ही संयुक्त राष्ट्र संघ, अमेरिका आणि सर्व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांना पाकिस्तानविरुद्ध कठोर निर्बंध लादण्याचे आणि पाकिस्तानला बलुचिस्तान मुक्त करण्याचे आवाहन करतो. बलुचिस्तानची जनता जागरूक आहे, सज्ज आहे आणि अन्यायाविरुद्ध लढण्यास कटिबद्ध आहे, असे बलुचिस्तानातील लोकांचे म्हणणे असल्याचे मीर यार यांनी म्हटलेय.


Powered By Sangraha 9.0