केरळात पाऊस येण्यापूर्वीच मुंबई-कोकणात ऑरेंज अलर्ट जारी

22 May 2025 17:08:14

Monsoon to Prepone in Maharashtra this year

मुंबई : भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिलेल्या माहितीनुसार, २०२५ चा नैऋत्य मोसमी पाऊस येत्या चार ते पाच दिवसांत केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे महाराष्ट्रातही लवकरच मान्सून पोहोचण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रवातीय स्थितीमुळे मुंबई, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा आणि पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

यावेळी होणाऱ्या मुसळधार पावसामुळे काही भागांत पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात बेमोसमी पावसामुळे ४०० ते ४५० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून, सुमारे ७०० ते ८०० शेतकऱ्यांना फटका बसला आहे.

हवामान विभाग सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि वेळोवेळी अद्ययावत माहिती देत आहे. नागरिकांनी अधिकृत सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन सध्या करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0