माझ्या वैज्ञानिक म्हणून लहानशा कार्यात नारळीकरांच्या एका सिद्धांताला पुराव्यांसोबत सिद्ध करण्याची संधी मिळाली. पुरावा सापडलासुद्धा, पण आज एक खंत वाटते की, मी थोडे धाडस नाही केले? की मी त्यांच्याशी संपर्क नाही साधला? आज कदाचित या अभिवादनातून मी अनंतात विलीन झालेल्या जयंत विष्णू नारळीकर या थोर महानुभावाशी थेट माझे मनोगत व्यक्त करू शकेन...
आधुनिक भारताच्या इतिहासात काही मोजकीच व्यक्तिमत्त्वे होऊन गेली, ज्यांनी ज्ञान, विज्ञान, सज्ञान यांचा प्रचार आणि प्रसार स्वकर्तृत्वावर व संस्था स्थापनेतून कुशलतेने केला. ज्या काळात पाश्चात्य देशातील संस्थानात आरूढ होणे मोठे समजले जात असे, त्याच काळात भारतात नैसर्गिक विज्ञानावर भर देणार्या संशोधन संस्थेची स्थापना करण्याचे श्रेय फार कमी वैज्ञानिकांना मिळाले. असे एक दुर्मीळ व्यक्तिमत्त्व, प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर अनंतात विलीन झाले. नारळीकर यांचे देशाला आणि विज्ञानाला वाहिलेले आयुष्य हे अनेकांना स्पर्शून गेले. त्या अनेकांपैकी मीसुद्धा एक आहे. माझ्या त्यांच्यासोबत तशा काही आठवणी नाहीत. मी त्यांना फक्त दूरवरून एका व्याख्यानमालिकेत ऐकले होते. त्यांना दुरून पाहिले होते. एकदा संवादाचा योग आला होता; पण तो योग म्हणूनच राहून गेला.
खरं तर नारळीकरांच्या कामाचा व्याप एवढा मोठा आहे की, भारतीय अंतराळ विज्ञानात ज्यांनी कुणी काम केले, त्यांनी नारळीकरांचे प्रबंध, त्यांचे सिद्धांत हमखास संदर्भात दखल घेतले आहेत. माझ्या वैज्ञानिक म्हणून लहानशा कार्यात त्यांच्या एका सिद्धांताला पुराव्यांसोबत सिद्ध करण्याची संधी मिळाली. पुरावा सापडलासुद्धा, पण आज एक खंत वाटते की, मी थोडे धाडस नाही केले? की मी त्यांच्याशी संपर्क नाही साधला? आज कदाचित या अभिवादनातून मी अनंतात विलीन झालेल्या जयंत विष्णू नारळीकर या थोर महानुभावाशी थेट माझे मनोगत व्यक्त करू शकेन, या आशेवर या पुढच्या ओळी लिहितो.
डॉ नारळीकर, आपण ‘आयुका’च्या स्थापनेच्या अगोदर ‘टाटा इन्स्टिट्यूट फॉर फंडामेंटल रिसर्च’ येथे ज्येष्ठ प्राध्यापक होतात. खगोलशास्त्राच्या वर इंग्लंडमध्ये उच्चस्तरीय मांडणी करून तुम्ही भारतात जेव्हा परतला, तेव्हा ब्रह्मांडाची रासायनिक उत्क्रांती अर्थात ’’ या विषयात सखोल संशोधन करण्याचा विडा उचलला. त्याच काळात आपल्या छत्राखाली एक प्रतिभावान विद्यार्थी आले होते, ज्यांचे नाव नारायण चंद्र राणा असे होते. राणा अशा काळात आपल्याकडे ‘पीएच.डी’ स्कॉलरच्या रूपात आले, जेव्हा तुमच्या ‘स्टेडी स्टेट थिअरी’ला रॉजर पेनरोस, जॉर्ज एलिस आणि स्टीफन हौकिंगच्या ‘बिग बँग’ने सैद्धांतिक आव्हान दिले होते. हे ब्रह्मांड अनंतकाळापासून स्थिर आहे, अशी आपली थिअरी, तर ‘बिग बँग’ थिअरीनुसार ब्रह्मांडाची सुरुवात एका एकलतेपासून म्हणजेच ’ पासून झाली असे म्हणणे आहे. ‘बिग बँग’ थिअरीच्या उभारणीमध्ये 1964 हे वर्ष अगदी महत्त्वाचे मानले जाते. त्याकाळात तुम्ही केंब्रिज येथे संशोधन करत असताना अमेरिकेत रॉबर्ट विल्सन आणि अर्नो पेन्झीअस यांनी लेीाळल चा क्रांतिकारी शोध लावला. हा बॅकग्राऊंड म्हणजे, संपूर्ण दृश्यमान ब्रह्मांडात एक मायक्रोवेव्ह उत्सर्जन अनुभवता येतो, ज्याचे सरासरी तापमान शून्यापासून 270 डिग्री सेल्सिअस एवढे कमी आहे. या उत्सर्जनाचे स्रोत काय असावे, याचा तुम्ही छडा लावायचे ठरविले आणि त्यासोबतच ‘स्टेडी स्टेट’च्या सशक्तीकरणाची जबाबदारी राणा यांना आपण दिली आणि त्यांनी ती अगदी चिकाटीने आणि मात्सुद्दीने पार पडली.
1979 साली तुमच्या सान्निध्यात राणा यांनी आपल्या पहिल्यावहिल्या संशोधनपत्रात एक कमालीची कल्पना मांडली. पेन्सिलची लेड, ज्या ग्रॅफाईट नामक पदार्थापासून बनते, ते ग्रॅफाईट ब्रह्मांडात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. अनेक तारे, जे ब्रह्मांडातील दुसर्या पिढीचे आहेत, त्यांच्या अंतकाळी ते अनेक जड मूलतत्त्वांचे (हशर्री शश्रशाशपीीं) उत्सर्जन करतात. अशाच तार्यांमधून कार्बनचे स्वरूप असलेले ग्रॅफाईटचेसुद्धा उत्सर्जन होते. राणा आणि आपण एक नावीन्यपूर्ण भाकित मांडले. मांजरीच्या मिशांसारख्या सूक्ष्म कणांसारख्या आकारात जर ग्रॅफाईट घडवले आणि अख्या ब्रह्मांडात जर ते पसरविले, तर ते ब्रह्मांडातील तार्यांची उष्णता शोषून दीर्घ काळासाठी त्याच उष्णतेला पुन्हा उत्सर्जित करू शकतात. याच पुनःउत्सर्जनातून ’Cosmic microwave background ’ तयार होत असावे, असे आपले म्हणणे होते.
या आपल्या भाकिताला अनेक वर्षे उलटली आणि 2008 साली माझ्या अमेरिकेतील दोन ज्येष्ठ सहकार्यांनी ‘कार्नेगी इन्स्टिट्यूशन ऑफ वॉशिंग्टन' स्थित अॅण्ड्रयू स्टीली आणि ‘नासा जॉन्सन स्पेस सेंटर’ स्थित ‘मार्क फ्रीस’ मांजरीच्या मिशांसारख्या सूक्ष्म ग्रॅफाईटचा अंतराळातून पृथ्वीवर पडलेल्या अत्यंत पुरातन उल्केमध्ये शोध लावला. त्यांच्या विश्लेषणानुसार, हे ग्रॅफाईट नवजात सूर्याच्या अवतीभोवती म्हणजेच पृथ्वी बनण्याच्या पूर्वीच बनलेले असावे. आपल्या एका विलक्षण भाकितांचा भौतिकी पुरावा मिळाला होता. पण, नियतीचा खेळ असा, आपणास न त्यांना त्या शोधाचा सखोल व संयुक्त अभ्यास करता आला. मी जेव्हा स्टीली आणि फ्रीस या दोघांसोबत काम केले, तेव्हा आम्ही तुमच्या भाकितांचा आणि त्यांच्या शोधाचा आणखीन खोलवर अभ्यास करायचे ठरविले होते. ग्रॅफाईटच्या मांजरमिशा या सुईसारख्या नसून गुंडाळलेल्या अगदी पातळ चटईसारख्या होत्या. ग्रॅफाईटची पातळ चटई हे ‘ग्राफीन’ असते, हे जगाला 2004 साली समजले होते. प्रयोगशाळेत ग्राफीनच्या शोधासाठी आंद्रे गाईम आणि कॉन्स्टन्टीन नोवोसिलोव्ह यांना रसायनशास्त्राचा ‘नोबेल’ पुरस्कारही मिळाला होता. पण, गाईम नोवोसिलोव्ह यांना ग्राफिनच्या निसर्गात स्वतंत्र अस्तित्वाचा पत्ता नव्हता आणि स्टीली आणि फ्रीस हे उल्कांचे अभ्यासक असल्यामुळे त्यांनासुद्धा ‘ग्राफीन’बद्दल तेव्हा फार माहीत नव्हते.
2015 साली जेव्हा मी अमेरिकेत होतो, तेव्हा मी स्टीली आणि फ्रीस यांनी मिळून उल्कामधील मांजरमिशा या गुंडाळलेल्या ‘ग्राफीन’ने बनल्या आहेत, याचा शोध ‘रमण स्पेक्टरोस्कोपी’च्या माध्यमातून लावला. ब्रह्मांडातील नवजात आणि मृत्युमुखी पडणारे तारे अनेक रासायनिक घटकांचे उत्सर्जन करतात. त्यापैकी कार्बनने बनणारे ग्रॅफाईट हे मुबलक प्रमाणात तयार होत असत. कार्बनचा आणि त्यामुळे ग्रॅफाईटचा गुणधर्म असा की, ते अनेक आकारांमध्ये घडविता येते आणि ग्रॅफाईट हे उत्तमरित्या कुठल्याही रासायनिक प्रक्रियेला प्रतिक्रियाहीन असते. तर आपले आणि राणांचे भाकित अगदी खरे होते आणि त्या भाकिताचा वास्तविक पुरावा शोधण्याचा आनंद आम्हाला आहे.
आपले नाव जगात एक अत्यंत महत्त्वाच्या विश्वउत्पत्तिशास्त्रज्ञांच्या रूपात नेहमीच अजरामर राहील. पण, तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा विस्तार विज्ञानापलीकडेही होता. किचकट विज्ञानाला सोप्या शब्दांत सामान्य जनतेसोबत आपण नेले. महाराष्ट्राच्या आणि भारताच्या कानाकोपर्यात राहणार्या माझ्यासारख्या अनेक मुलामुलींना आपल्या लेखणीतून आणि कार्यातून आपण प्रेरणा दिली आणि यापुढेसुद्धा देत राहाल. ‘आयुका’मधील अनेक वैज्ञानिक मित्र असूनसुद्धा मला आपल्याशी कधीच भेट घेता आली नाही, याची मला नेहमीच खंत राहील. आपले कार्य मोठे आहे आणि देश आपल्या प्रेरणादायी आयुष्याला नेहमीच आपुलकीने स्मरणात ठेवेल, याची मला खात्री आहे.
डॉ. चैतन्य गिरी
(लेखक विज्ञान आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा धोरणाचे ‘ऑबसेर्व्हर रिसर्च फाऊंडेशन’ स्थित अभ्यासक आहेत.)