अकरावी सराव प्रवेश प्रक्रियेला सुरूवात

19 May 2025 18:05:28

mock admission process for 11th standard has started

कल्याण : राज्य शासनाच्या शिक्षण विभागाकडून अकरावीच्या सराव प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झाली असून त्यात ठाणे जिल्ह्यातील 454 कनिष्ठ महाविद्यालये सहभागी झाली आहेत. सर्व विद्यार्थी आणि पालकांनी वेळापत्रकानुसार ऑनलाईन नोंदणी व प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहान शिक्षणाधिकारी (माध्यमिक) ललिता दहीतुले यांनी केले आहे.

अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला 21 मे पासून अधिकृतरीत्या सुरूवात होणार आहे. पण तत्पूर्वी संकेतस्थळावर 19 ते 20 मे या कालवधीत सरावासाठी प्रवेश प्रक्रिया खुली करण्यात आली आहे. 21 ते 28 मे या कालवधीत प्रत्यक्ष नोंदणी व महाविद्यालय पसंतीक्रम भरावयाचा आहे. 30 मे ते 1 जून या कालवधीत हरकती व दुरूस्ती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. 3 जून रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. 5 जून रोजी गुणवत्ता यादीवर आधारीत प्रवेश वाटप, 6 जून रोजी वाटप केलेल्या महाविद्यालयांची यादी पोर्टलवर प्रसिध्द केली जाणार आहे. 6 ते 12 जून रोजी पर्यायाद्वारे प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. 14 जून रोजी दुस:या फेरीसाठी रिक्त जागांची यादी जाहीर केली जाणार आहे.

प्रवेश प्रक्रिया पूर्ण करताना विद्याथ्र्यानी प्रमाणपत्रंाची स्कॅन प्रत अपलोड करणे आणि संबंधित महाविद्यालयात प्रत्यक्ष हजर राहून कागदपत्रंाची पडताळणी करणे आवश्यक आहे. विद्याथ्र्यानी प्रथम पसंती मिळाल्यास तिथेच प्रवेश घेणे अनिर्वाय राहील. एकदा प्रवेश घेतल्यानंतर तो अंतिम मानण्यात येईल. त्यामुळे पालकांनी आणि विद्याथ्र्यानी यामध्ये गांर्भीयाने सहभागी व्हावे आणि वेळापत्रकांचे काटेकोर पालन करावे असे आवाहान शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0