'ऑपरेशन सिंदूर'मध्ये 'इस्रो' बनली भारतीय सैन्यदलाचे त्रिनेत्र!

17 May 2025 19:11:49
ISRO plays a vital role in success of operation sindoor

नवी दिल्ली : ७ मे २०२५ रोजी झालेल्या 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये इस्रोने भारतीय संरक्षण यंत्रणेला निर्णायक आघाडी मिळवून दिली. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांना भारतीय हवाई संरक्षण यंत्रणांनी यशस्वीपणे निकमी केले. ह्या मागे इस्रोचा मोठा वाटा आहे.

या कारवाईत भारतीय संरक्षण यंत्रणांनी ६०० हून अधिक पाकिस्तानी ड्रोन नष्ट केले. 'आकाश' क्षेपणास्त्र प्रणाली आणि 'आकाशतीर' नियंत्रण प्रणालीच्या मदतीने या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यात आले. इस्रोच्या उपग्रहांनी दिलेल्या अचूक माहीतीमुळे हवाई संरक्षण यंत्रणांना वेळेवर प्रत्युत्तर देता आले.

भारतीय हवाई दलाने 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्रांच्या मदतीने पाकिस्तानच्या ११ हवाई तळांवर हल्ले केले. ज्यामुळे त्यांच्या हवाई संरक्षण क्षमतेला मोठा फटका बसला. या कारवाईत कोणतीही भारतीय हानी झाली नाही, हे विशेष आहे.
या ऑपरेशनमध्ये 'आकाशतीर' प्रणालीने रडारच्या सहायाने शत्रूच्या ड्रोनना अचूक शोधून संपवायला मदत होते. या प्रणालीमुळे शत्रूच्या हल्ल्यांना त्वरित प्रतिसाद देणे शक्य झाले.

'ऑपरेशन सिंदूर'ने भारताच्या स्वदेशी संरक्षणाची तंत्रज्ञानाची ताकद जगासमोर आणली आहे. इस्रो आणि डीआरडीओच्या सहकार्यामुळे भारताने ऑपरेशन सिंदूर यशस्वीरित्या पार पाडले.

आधुनिक यंत्रणेमध्ये भर


भारताच्या सध्याच्या लष्करी ताफ्यात अंदाजे ९-११ सॅटलाईट फक्त इमेजिंग, रडार, कम्युनिकेशन आणि नेव्हिगेशन यासाठी वापरले जातात. ऑपरेशन सिंदूर नंतर ह्या ताफ्यात नवीन शस्त्रास्त्रांची भर पडणार आहे. माहितीनुसार
१००-१५० नवीन सॅटलाईट जे संरक्षण दलांना आणखी लवकर व अचूक माहिती सांगतील.
ह्यापैकी ५२ सॅटलाईट हे फक्त भारताच्या ७००० किमीच्या किनारपट्टीच्या भागावर लक्ष देतील.

आधुनिक हवाईयंत्रणेच महत्व


युद्धातील पहिली हालचाल आकाशातून होऊ शकते. अश्या परिस्थीतीत इस्रोच्या सॅटलाईट्सने अप्रत्यक्षपणे भारतीय लश्कराला केलेली मदत महत्वाची आहे. संरक्षणदलाला ही कामगीरी इस्रोच्या मदतीशिवाय पार पाडणे कठीण गेले असते.
Powered By Sangraha 9.0