नावे बदलून सत्य बदलणार नाही

- भारताने चीनला झापले

    14-May-2025
Total Views | 19
नावे बदलून सत्य बदलणार नाही

नवी दिल्ली, पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनने अरुणाचल प्रदेशातील काही ठिकाणांची नावे बदलली आहेत. या मुद्द्यावर भारताने चीनला चोख प्रत्युत्तर देऊन अशा हास्यास्पद प्रयत्नांनी हे वास्तव बदलणार नसल्याचे म्हटले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, "आम्हाला असे आढळून आले आहे की चीनने भारतातील अरुणाचल प्रदेश राज्यातील ठिकाणांची नावे बदलण्याचे व्यर्थ आणि हास्यास्पद प्रयत्न केले आहेत. ते म्हणाले, "आमच्या तत्वनिष्ठ भूमिकेनुसार आम्ही अशा प्रयत्नांना स्पष्टपणे नकार देतो.

या मुद्द्यावर माध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देताना जयस्वाल यांनी ही टिप्पणी केली. ते म्हणाले, "क्रिएटिव्ह नामकरणामुळे अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि नेहमीच राहील हे निर्विवाद वास्तव बदलणार नाही.


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121