मुंबई: ( BJYM Mumbai ) BJYM मुंबईचे अध्यक्ष श्री तजिंदर सिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली आज BJYM मुंबईच्या प्रतिनिधी मंडळाने DCP झोन ९ श्री निमित गोयल यांची भेट घेतली आणि Why Loiter Campaign विरोधात अधिकृत तक्रार दाखल केली.
भारतीय सेना सध्या पाकिस्तानात दहशतवादाविरोधात निर्णायक कारवाई करत असताना, या तथाकथित शांततामोर्च्याचे आयोजन केवळ देशविरोधी विचारांना चालना देणारे आहे. हा मोर्चा भारतीय सेनेच्या मनोबलावर घाला आहे.
डाँ केयूर प्रामाणिक ,श्री साहिल मिश्रा, श्री प्रणव सिंह ठाकूर आणि इतर कार्यकर्त्यांसह हा मोर्चा रोखण्याची मागणी करण्यात आली.
DCP श्री निमित गोयल यांनी आम्हाला विश्वास दिला आहे की अशा देशविरोधी कार्यक्रमास परवानगी दिली जाणार नाही. “राष्ट्र प्रथम – देशद्रोही विचारांना आणि सेनेच्या अपमानाला कदापि सहन केले जाणार नाही.