मुंबई:१ मे २०२५ पासून देशभरात काही बदल लागू होणार आहेत. ज्यांचा परिणाम नागरिकांच्या रोजच्या जीवनावर होणार आहे. सर्वात महत्वाचा बदल म्हणजे ११ राज्यांमध्ये एक राज्य एक आरबीआय योजना लागू केली जाईल. या योजनेमध्ये महाराष्ट्राचा देखील समावेश आहे. या योजनेअंतर्गत बँकिंग सेवा अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे.
एटीएम मधून पैसे काढण महाग होणार!!
रिझर्व्ह बँकेच्या नव्या नियमानुसार, एटीएममधून रोख रक्कम काढण्याचे शुल्क आता प्रति व्यवहार १९ रुपये झाले आहे, तर बँक बॅलन्स तपासण्यासाठी प्रति व्यवहार ७ रुपये घेतले जातील.
रेशन कार्डसाठी ई-केवायसी (e-KYC) अनिवार्य करण्यात आली आहे.
नागरिकांनी आपली ओळख तपासणे आवश्यक ठरणार आहे. गॅस सिलेंडरच्या किंमतीत आजपासून वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे, नागरिकांमध्ये या विषयी उत्सुकता आहे.
रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये नवीन बदल
रेल्वे प्रवाशांसाठी देखील बदल झाले असून, आजपासून नवीन रेल्वे तिकीट बुकिंग नियम लागू करण्यात आले आहेत. या नियमांमध्ये आरक्षण, रद्दीकरण आणि वेटिंग लिस्ट संदर्भातील बदल घडणार आहेत. हे सर्व बदल सामान्य जनतेसाठी महत्त्वाचे असून त्यांमुळे सामान्य जनतेच्या आयुष्यात चांगले बदल येणे अपेक्षित आहे.