पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी १४० कोटी जनता आहे! काश्मीरमध्ये पुन्हा शांतता प्रस्थापित होईल : मुकेश अंबानी

"व्हेवज २०२५ समीटमध्ये उपस्थित राहून मोदींनी जगाला संदेश आम्ही थांबणार नाही", असे म्हणत मुकेश अंबानी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या

    01-May-2025
Total Views | 12

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी १४० कोटी जनता आहे! काश्मीरमध्ये पुन्हा शांतता प्रस्थापित होईल : मुकेश अंबानी

मुंबई
: पहालगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यांमुळे भारत हा थांबणार, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला आहे, १४० कोटी जनता मोदीजी तुमच्या सोबत आहे. या परिस्थितीतून तुम्ही मार्ग काढाल, असा आम्हाला विश्वास आहे, असे मत रिलायन्स समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी व्यक्त केले. मुंबईत सुरू असलेल्या जागतिक दृक्श्राव्य आणि मनोरंजन समिट २०२५ (व्हेवज)मध्ये ते बोलत होते.

मुकेश अंबानी म्हणाले, "पहालगामध्ये गेल्या काही दिवसात जे झालं ते निषेधार्थ आहेच. काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इथे येऊन जगाला या मंचावर येऊन एक संदेश दिला आहे. मोदीजी तुमच्यासोबत संपूर्ण १४० कोटी जनता आणि त्यांचे आशीर्वाद आहेत.

भारत व्हेवजच्या माध्यमातून जगात एकप्रकारे ताकद म्हणून उभा राहणार आहे. भारताच्या स्टोरी टेलिंगची तुलना ही जागतिक स्तरावर कुणाशीही करता येणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारत हा जगापुढे डिजिटल मंच म्हणून विकसित केला. भारतातील क्रिएटर्स आणि स्टोरीटेलर्स यांना जागतिक मंच मिळवून देणारा या व्यासपीठाद्वारे २८ दशलक्ष डॉलर्सची उलाढाल असलेले हे क्षेत्र १०० दशलक्ष डॉलर्सपर्यंत पोहोचणार आहे यात शंका नाही. ही फक्त सुरुवात आहे. स्टोरीटेलिंगच्या क्षेत्रात आम्ही नव्या क्षितिजापर्यंत पोहोचण्याचा विक्रम व्हेवजच्या मंचाद्वारे करू, असा आम्हाला विश्वास आहे.', असेही ते म्हणाले.

अग्रलेख
जरुर वाचा
जयंत पाटील यांनी राजीनामा दिला, की घेतला? - चर्चांना उधाण; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष, रोहित पवारांचे स्वप्न पुन्हा भंगले

जयंत पाटील यांनी राजीनामा दिला, की घेतला? - चर्चांना उधाण; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष, रोहित पवारांचे स्वप्न पुन्हा भंगले

स्थानिक स्वराज्य संस्थांचा बिगुल वाजला असताना, शरद पवारांनी अचानक प्रदेशाध्यक्ष बदलल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ७ वर्षे एकहाती पक्ष सांभाळणाऱ्या जयंत पाटलांनी अचानक राजीनामा द्यावा आणि तो शरद पवारांनी स्वीकारावा, इतक्यापुरती ही घटना मर्यादीत नाही. त्यामुळे हा राजीनामा खरोखरच स्वेच्छेने दिला गेला की पक्षातील गटबाजीमुळे त्यांना हटवण्यात आले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दुसरीकडे, शशिकांत शिंदे यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्ष पदाची माळ पडली असली, तरी रोहित पवार आणि समर्थकांत भलती नाराजी पसरल्या..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121