प्रतिज्ञापत्रासाठी 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ! महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय
05-Mar-2025
Total Views |
मुंबई: ( No stamp duty for affidavit in Maharashtra ) राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच नागरिकांना मोठा दिलासा दिला. आता शासकीय कामासाठी नागरिकांचा खिसा कापल्या जाणार नाही. त्यांना प्रमाणपत्रासाठी मुद्रांक शुल्क भरण्याचा ताप कमी झाला आहे. काही प्रमाणपत्रासाठी नागरिकांना प्रतिज्ञापत्र सादर करावे लागते. यापूर्वी राज्य सरकारने 500 रुपयांचे प्रतिज्ञापत्र सादर करणे अनिवार्य केले होते.त्याशिवाय प्रमाणपत्र देण्यात येत नव्हते. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिज्ञापत्रासाठी 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयाचा विद्यार्थी, पालक आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिले आहेत.